• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 19, 2023

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

नवी मुंबईची ऊर्जा देशाला मिळो- महाविजय अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद- विविध समाज बांधवांकडून जल्लोषात स्वागत- संपर्क से समर्थन अभियानात पंतप्रधानपदी मोदींच्या नावाचा गजर- महा विजयासाठी नवी मुंबई भाजपा जिल्ह्यातील वॉरिअर सज्ज

नवी मुंबई : देशातील १४० कोटी जनतेला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी हवे असून तेच २०२४ मध्ये पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा पुन्हा शपथ घेतील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय २०२४ अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर ४०० प्लस तर महाराष्ट्र राज्यात ४५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट केले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघाचा कार्यक्रम संकल्प दौरा संपन्न झाला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
महाविजय अभियानाच्या सांगता प्रसंगी वाशीतील एमजीएम कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या चौक सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जनतेला आवाहन करताना भारताला जगातील सर्वोत्तम देश बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदी असणे गरजेचे असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी भव्य राम मंदिराचे निर्माण केले. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर करून त्यांचा सन्मान केला, असे सांगितले. मोदी यांनी देश एकसंघ करण्याचे काम केले. काश्मीरमधील ३७० कलम हटवले. काश्मीरमध्ये कधीही तिरंगा फडकला नव्हता त्या ठिकाणी तिरंगा फडकला. नवी मुंबईमध्ये संपर्क से समर्थन अभियानामध्ये नागरिकांनी मोदीजींना समर्थन दिले.‌ जोपर्यंत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लोकनेते आमदार गणेश नाईक यांना नवी मुंबईचे शिल्पकार असे संबोधले आणि त्यांच्या विकास कार्याचा गौरव केला.‌ ठाणे लोकसभेमधून महायुतीचा उमेदवार प्रचंड मतांनी विजय होऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी समर्थन देण्यासाठी संसदेमध्ये उपस्थित असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महा विजयाचा केलेला संकल्प पूर्णत्वास जाईल, असा विश्वास केला. लोकसभा विधानसभा आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविजय प्राप्त होईल असे स्पष्ट केले. तर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या आवाहनानुसार नवी मुंबईतील दहा हजार राम भक्तांना अयोध्या दर्शन घडविण्याचे जाहीर केले. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सभेचा समारोप करताना मान्यवरांचे आभार मानले.
महा विजय अभियान प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, आमदार रमेश पाटील, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक, ठाणे लोकसभा निवडणूक प्रमुख विनय सहस्त्रबुद्धे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास योजना संयोजक संजय बाळा भेगडे, ठाणे लोकसभा समन्वयक जयप्रकाश ठाकूर, ठाणे विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ठाणे लोकसभा विस्तारक दीपक जाधव, आमदार मंदा म्हात्रे,‌आमदार निरंजन बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख निलेश म्हात्रे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी विविध मोर्चा आघाड्यांचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नवी मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोकनेते आमदार गणेश नाईक, विनय सहस्त्रबुद्धे विक्रांत पाटील माधवी नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, आमदार रमेश पाटील, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी सभापती अनंत सुतार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आरपीआय रामदास आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर त्यांनी या स्मारकाची पाहणी केली. डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन, ग्रंथालय आणि ध्यानधारणा केंद्राला भेट दिली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाशी येथील अश्वारूढ पुतळ्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि लेझीमच्या साथीने प्रदेशाध्यक्षांचे या ठिकाणी‌ अतिशय उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ व महिला कार्यकर्त्यांचा उत्साह, युवांचा जल्लोष पहायला मिळाला. विविध जाती धर्मातील नागरिकांनी खेळाडूंनी या ठिकाणी श्री बावनकुळे यांचे स्वागत केले. लोककल्याणकारी मोदी सरकारच्या माध्यमातून मागील ९ वर्षात देशाची झालेली प्रगती याविषयीची माहिती देणारी चित्रफीत या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली. त्यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा सत्कार देखील करण्यात आला. ऐरोली आणि बेलापूर विधानसभा सुपर वॉरिअरची बैठक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहांमध्ये घेतली. लोकसभेतील महाविजय साकारण्यासाठी त्यांनी उपस्थित वॉरिअर्सना महत्त्वाच्या सूचना केल्या.
जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी याप्रसंगी नवी मुंबई भाजपा जिल्ह्यामध्ये केलेल्या कार्याची माहिती देऊन महा विजयासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
वाशीतील मराठा भवन येथून घर घर संपर्क रॅलीचा शुभारंभ झाला. या पदयात्रेमध्ये 2024 च्या महा विजय संकल्प साठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समर्थन देण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान कोण होणार? हा प्रश्न प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विचारल्यावर सर्वांनी एक मुखाने नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. पंतप्रधान पदी मोदी हेच पाहिजेत. अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशात चांगले काम होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.‌ यावेळी मोदी नावाचा गजर ऐकावयास मिळाला. या रॅली दरम्यान प्रदेशाध्यक्षांनी जुहूगाव येथील मरीआई मातेचे मनोभावे दर्शनही घेतले. घर घर संपर्क रॅली दरम्यान ‘मोदी मोदी’ नावाचा गजर सर्वत्र घुमला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ’घर घर चलो संपर्क’ अभियान रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधला. त्याचबरोबर नागरिकांना मोदी सरकारने ९ वर्षात केलेल्या योजना आणि निर्णयांची माहिती असलेली पत्रके वाटप करण्यात आली. यावेळी संपूर्ण वातावरण भाजपमय झाले होते. ’मेरी माटी मेरा देश’ अभियानही राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पवित्र मातीचे संकलन करण्यात आले.

Previous Post

कायम, ठोक, कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

Next Post

प्रत्येक सेक्टरमध्ये कॉंग्रेसचे कार्यालय उघडणार : रविंद्र सावंत

Next Post
प्रत्येक सेक्टरमध्ये कॉंग्रेसचे कार्यालय उघडणार : रविंद्र सावंत

प्रत्येक सेक्टरमध्ये कॉंग्रेसचे कार्यालय उघडणार : रविंद्र सावंत

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहासह सारसोळे गावची पाण्याची समस्या सोडवा : संदीप खांडगेपाटील

भविष्यात नवी मुंबईत रोजगाराच्या विपुल संधी- लोकनेते आ. गणेश नाईक

भविष्यात नवी मुंबईत रोजगाराच्या विपुल संधी- लोकनेते आ. गणेश नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com