• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2023

या दिव्यशक्तीचा उपयोग मोदीजी देशासाठी करा 

adminbyadmin
in संपादकीय
0
या दिव्यशक्तीचा उपयोग मोदीजी देशासाठी करा 

भारतीय संस्कृती आणि सनातन हिंदुधर्म महान आहे. इंग्रज आणि काँग्रेसच्या दीर्घकालीन राजवटीत सनातन सत्य व येथील साक्षात्कारी साधू संत आणि मठ मंदिरांना जाणीवपूर्वक दाबण्याचे व ख्रिश्चन, मुस्लिम धर्माला मदत करण्याचे काम झाले. आपल्या देशात जेवढे पुरोगामी किंवा निधर्मी राज्यकर्ते किंवा समूह यांनी सतत सनातन हिंदुधर्माचा द्वेष केल्यामुळे मूळ दिव्यशक्ती आजवर उजेडात येऊ शकली नव्हती. आता मात्र देशात खऱ्या धर्मरक्षकांचे राज्य आल्यामुळे देशभरातील दिव्य महापुरुष, साक्षात्कारी संत आणि मठाधीश्वर यांनी धर्माच्या एकजुटीसाठी देशभरात काम सुरु केले आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून प्रामुख्याने जे दिव्यपुरुष देशभर धर्म जागरणासाठी बाहेर पडले आहेत. त्यांच्या मार्गात मूठभर धर्मद्रोही लोक अडसर निर्माण करीत आहेत. विज्ञानाचा आधार घेऊन महान सनातन धर्माला बदनाम करणाऱ्या लोकांना फासावर लटकविण्याचा कायदा संसदेत मंजूर झाला पाहिजे.

इस्लाम आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्या धर्मांतराचा धोका असणाऱ्या सनातन धर्माला वाचविण्यासाठी आजच्या घडीला बागेश्वर धामवाले परमपूज्य धीरेंद्र शास्त्री, पंडोखर सरकार, सिहोरवाले महान कथावाचक पंडित प्रदीप महाराज शर्मा असे असंख्य साधुसंत आणि महात्मा बाहेर पडले आहेत. या सगळ्यांना दिव्यशक्ती प्राप्त झालेली आहे. आपल्या देशात असे संत ,महात्मे की जे जाग्यावर बसून देशात काय घडणार आहे हे ओळखू शकतात. त्यांनी शाप दिला तर जगातील कोणतीही शक्ती वाचवू शकत नाही. बागेश्वर धाम महाराज आणि पंडोखर सरकार तर कलियुगातील साक्षात  देव आहेत. मानव जातींवर येणाऱ्या संकटांची चाहूल त्यांना आधीच लागते अशावेळी लाखो भाविकांच्या संकटांचे निवारण ते करीत असतील तर त्यावर आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. एवढे महान मानवतावादी कार्य हा संत समाज करीत असेल तर त्यांच्या कार्यात अडचण निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचा एखादा कायदाही देशात झाला पाहिजे.

या संत, महात्म्यांनी आजवर कोट्यवधी लोकांच्या जीवनात कृपेचा प्रकाश पाडला आहे. देशभर जे सत्संग सुरु आहेत, ते बघून ईर्ष्या होणाऱ्या सगळ्या सेक्युलर लोकांनी कारण नसताना त्यांना विरोध करून धर्माचा पर्यायाने देशाचा द्रोह सुरु केला आहे. केंद्र सरकारने त्यासाठी धर्म संस्कृती मंत्रालय निर्माण करून देशभर सरकारी खर्चाने या संत महात्म्यांची आयोजने केली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. देशाचे दिव्यपुरुष प्रधानमंत्री, साक्षात शिव अवतार नरेंद्रजी मोदी सरकार यांनी या संत महापुरुषांचा उपयोग देशासाठी केला पाहिजे. देशातील सगळ्या धार्मिक संस्थान,मठ,मंदिरे आणि आश्रम याना सरकारी घोषित करून दरवर्षी शंभर कोटींचे अनुदान द्यायला हवे. धर्म वाचला तरच मानव वाचेल हे सूत्र लक्षात घेऊन भाजपनेही त्यासाठी मोहीम सुरु केली पाहिजे. आगामी काळात लोकसभेच्या पन्नास टक्के जागा साधू संतांसाठी राखीव ठेवायला हव्यात.

आपल्या देवांनी ज्या पद्धतीने राक्षस,असुर आणि धर्मद्रोह्यांचा विनाश केला आहे तसाच विनाश पाकिस्तान, चीन आणि शत्रू देशांचा करण्याची आता वेळ आली असून हे महान काम केवळ साधू संतांची दिव्यशक्तीच करू शकते. त्यासाठी देशाच्या संरक्षण खात्यात प्रमुख सल्लागार किंवा तिन्ही दलाचे सहप्रमुख पद निर्माण करून या संत विभूतींची त्यावर सन्मानाने नियुक्ती केली पाहिजे. नरेंद्र मोदी ज्यांच्या चरणी नतमस्तक होतात त्या सगळ्या महापुरुषांचा अधिकार केवढा मोठा असला पाहिजे याची जाणीव ठेवून या हिंदुराष्ट्रात साक्षात्कारी असणाऱ्या संतांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली पाहिजे. आजपर्यंत काँग्रेस आणि इंग्रजांनी या दिव्यशक्तीकडे दुर्लक्ष करून देशाचे मोठे नुकसान केले आहे आता आपलेच हिंदूंचे सरकार आले आहे आणि हेच सरकार आगामी शंभर वर्ष आम्हाला ठेवायचे आहे त्यामुळे सगळी चिल्लर कामे बाजूला ठेवून सगळ्या आदरणीय साधुसंतांच्या हातात देशाची धुरा सोपवली पाहिजे.

हजारो वर्षाच्या तपस्या नंतर खऱ्या हिंदुत्वाचे सरकार देशात विराजमान झाले असताना योगिनी नुपूर शर्मा यांनी सद्वचने उद्धृत केल्यावर त्यांच्यावर कारवाई होते. अरबी म्लेंच्छ देशांसमोर हे सरकार गुडघे टेकते याचा प्रचंड राग खऱ्या हिंदूंच्या मनात खदखदत आहे त्यांना शांत करण्याची अपूर्व संधी मोदी आणि शहा याना आली आहे तिला हातचे गमावून या हिंदुराष्ट्राचे अतोनात नुकसान करू नका. कोणत्याही हिंदू सत्संगात आमच्या साधू संतांना अमर्याद बोलता यावे आणि त्यांनी केलेल्या कृतीकिंवा वक्तव्याला कोणत्याही कायद्याच्या कक्षेत आणता येणार नाही असा विशेष संत समाज संरक्षण कायदा केंद्र सरकारने आगामी संसद अधिवेशनात पारित करावा अशीही मागणी  आम्ही करीत आहोत. जो हिंदू विरोधी बात करेगा ,वो देश से निकाला जायेगा या नव्या मंत्राला तात्काळ सरकारी मान्यता देण्यात येऊन सायन्स काँग्रेसऐवजी  वैदिक भाजप असे तात्काळ नामांतर करावे असाही आम्ही आग्रह धरीत आहोत.

-पुरुषोत्तम आवारे पाटील

Previous Post

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगामध्ये भारताचा सन्मान वाढला : लोकनेते आ. गणेश नाईक

Next Post

विभागीय आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Next Post
विभागीय आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

विभागीय आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

रा. फ. नाईक विद्यालयात अडीच हजारांपेक्षा अधिक  विद्यार्थ्यांनी ऐकले पंतप्रधानांचे मौलिक मार्गदर्शन

रा. फ. नाईक विद्यालयात अडीच हजारांपेक्षा अधिक  विद्यार्थ्यांनी ऐकले पंतप्रधानांचे मौलिक मार्गदर्शन

सानपाडातील स्वामी विवेकानंद संकुलात ‘परिक्षा पे चर्चा २०२३’ उत्साहात

सानपाडातील स्वामी विवेकानंद संकुलात ‘परिक्षा पे चर्चा २०२३’ उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com