• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 28, 2023

रा. फ. नाईक विद्यालयात अडीच हजारांपेक्षा अधिक  विद्यार्थ्यांनी ऐकले पंतप्रधानांचे मौलिक मार्गदर्शन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
रा. फ. नाईक विद्यालयात अडीच हजारांपेक्षा अधिक  विद्यार्थ्यांनी ऐकले पंतप्रधानांचे मौलिक मार्गदर्शन

अनंतकुमार गवई :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये परीक्षेपे चर्चा २०२३ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  देशभरातून या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी होण्यासाठी ३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली  कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षेपे चर्चा कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.  याप्रसंगी नवी मुंबईतील विविध शाळांमधील सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परीक्षेसंबंधीचे मौलिक विचार ऐकले. माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक या मान्यवरांनी देखील पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी केलेला मनमोकळा, मार्गदर्शनपर संवाद पाहिला.

देशभरातून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी सखोल उत्तरे दिली. कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात. बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसं फसवलं? हे ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा, असा संदेश मोदी यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थीनीच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, आपण आवडीच्या विषयात अधिक वेळ घालवतो. त्यामुळे काही विषय अर्धवट राहून जातात. त्याचा भार वाढतो. त्यामुळे आधी अवघड विषयाची तयारी सुरु करा. तसेच यावेळी त्यांनी पालकांना उद्देशूनही मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांकडून अतिरीक्त अपेक्षा करु नयेत. मुलांवर दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनी दबाव घेऊ नये, यासाठी मोदी यांनी क्रिकेटमधील फलदांजाचे उदाहरण दिले. क्रिकेट सामना पाहताना लोक चौकार – षटकार असे ओरडत असतात. पण फलंदाज काही लोकांचे ऐकून फलंदाजी करत नाही. तो जसा चेंडू येईल तशी फलंदाजी करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील एका कसलेल्या फलंदाजाप्रमाणे केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे.

चौकट…..

काळानुसार मुलांचे प्रश्न बदलत असतात. त्याप्रमाणे उत्तरं द्यावी लागतात. पंतप्रधानांनी खूप सहज सरळ विद्यार्थांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आपले विद्यार्थी हे आपलं भविष्य आहे. पंतप्रधानाच्या भाषणाने मुलं प्रभावित झाली. परीक्षा कठीण आहे परंतु ती सोडवण्यासाठी आपल्याकडे यशस्वी पद्धती आहेत. पंतप्रधानांच्या भाषणाचा देशातल्या करोडो मुलांना फायदा होईल व आपलं भविष्य उज्वल होईल. आपली मुलं देशविदेशातल्या गोष्टी जाणतात. त्यामुळे काय करायचं हे त्यांना ठाऊक आहे. त्यांच्यावर ठराविक करिअरसाठी दबाव न टाकता त्यांच्या स्वतंत्र विचारांना लक्षात घेतले पाहिजे. मुलांच्या सवयींवर, वागणुकीवर लक्ष जरूर ठेवावे. मात्र त्यांचे स्वतंत्र विचार दाबू नये, हे पंतप्रधानांच्या भाषणातून जाणवले. विद्यार्थ्यांच्या  यशासाठी पंतप्रधानांचे मार्गदर्शन दिशादर्शक असल्याचे प्रतिपदान माजी खासदार संजीव नाईक यांनी यावेळी केले.

 

    अवतरण…

पंतप्रधानांच्या भाषणाने प्रेरणा मिळाली. परीक्षेचा ताणतणाव घेऊ नये.  आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्याप्रमाणे अभ्यास करावा.

– श्रुतिका सोलकर, विद्यार्थिनी इयत्ता बारावी

अवतरण…

 इतरजण किती टक्के मिळवतात यावर लक्ष देण्याऐवजी स्वतःची क्षमता वाढवण्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.  नकारात्मकता काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असा सल्ला आदरणीय पंतप्रधानांनी दिला.

–  राहुल गायकवाड विद्यार्थी इयत्ता दहावी

Previous Post

विभागीय आयुक्त  डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Next Post

सानपाडातील स्वामी विवेकानंद संकुलात ‘परिक्षा पे चर्चा २०२३’ उत्साहात

Next Post
सानपाडातील स्वामी विवेकानंद संकुलात ‘परिक्षा पे चर्चा २०२३’ उत्साहात

सानपाडातील स्वामी विवेकानंद संकुलात ‘परिक्षा पे चर्चा २०२३’ उत्साहात

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी : नाना पटोले

मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला : अतुल लोंढे

‘अदानी’मुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात : अतुल लोंढे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com