• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 9, 2023

पाणी जपून वापरा, सप्टेंबरपर्यत पुरेल इतकाच ‘मोरबे’त साठा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पाणी जपून वापरा, सप्टेंबरपर्यत पुरेल इतकाच ‘मोरबे’त साठा

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

नवी मुंबई :  प्रति दिन ४५० द.ल.लि. क्षमतेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे नवी मुंबईची जलसमृध्द शहर अशीही ओळख असून समाधानकारक पाणी पुरवठा हे शहराचे एक वैशिष्ट्य आहे. तथापि आजुबाजूच्या शहरांतील पाण्याची परिस्थिती पाहून नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखून गरजेपुरताच पाण्याचा वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नियमित करण्यात येते.

सन २०२१ मध्ये मोरबे धरण क्षेत्रात ४२२६.८० मि.मि. इतकी पर्जन्यवृष्टी झाल्याने १९०.८९० एम.सी.एम. जलसाठा धरणात जमा झाला होता. मात्र सन २०२२ मध्ये मोरबे धरण क्षेत्रात ३५५९.४० मि.मि. इतकीच पर्जन्यवृष्टी झाल्याने १३८.०८८ एम.सी.एम. इतका जलसाठा धरणात जमा झाला आहे. आजची धरणाची पातळी ८३.२३ मीटर इतकी असून गतवर्षी याच दिवशी म्हणजे ९ जानेवारी रोजी ही पातळी ८२.२३ मीटर इतकी होती. या जलसाठ्याव्दारे नवी मुंबईकरांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुलभपणे पाणी पुरवठा करणे शक्य आहे.

तथापि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील शहांच्या नागरी वसाहतींमध्ये सध्या केली जात असलेली पाणी कपात लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनीही पाण्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी पाणी वापरण्याबाबत नागरिकांकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचे निदर्शनास येत असून सोसायट्यांमधील भूमिगत व टेरेसवरील जलकुंभ ओव्हरफ्लो होणे, गाड्या धुण्यासाठी पाईपद्वारे पाण्याचा वापर करणे, पिण्याच्या पाण्याचा वापर इमारतींचे आवार अथवा पॅसेज धुण्यासाठी करणे, रस्ते धुणे अशा विविध प्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक पातळीवर विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. तरी नागरिकांनी आसपासच्या शहरांतील पाणी टंचाईसारखी परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला लाभलेली पाण्याची संपन्नता काटकसरीने वापरावी व जल ही देखील एक प्रकारची संपत्ती आहे याचे भान ठेवून तिचा काळजीपूर्वक वापर करावा आणि जागरुक नागरिक बनावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

महाराष्ट्र कर्मचारी युनियनची कंत्राटी कामगार कार्यकारिणी जाहिर

Next Post

कै. सिताराम मास्तर उद्यानातील वीजेच्या असुविधांचे निवारण करा : पांडुरंग आमले

Next Post
सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

कै. सिताराम मास्तर उद्यानातील वीजेच्या असुविधांचे निवारण करा : पांडुरंग आमले

महापालिका निवडणूकीत बेलापुर मतदारसंघच भाजपाला अनुकूल

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त सानपाड्यात क्रिकेट स्पर्धा, अष्टविनायक दर्शनचे आयोजन

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने लिपिक देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने लिपिक देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com