• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2022

चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची माफी मागून त्यांची दीदी व्हावे : सुषमा अंधारे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची माफी मागून त्यांची दीदी व्हावे : सुषमा अंधारे

मुंबई : पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सातत्याने लढा उभारणाऱ्या चित्रा वाघ यांनी यू टर्न घेतला आहे. संजय राठोड प्रकरण आता संपवूया, त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय, प्रश्न आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात माझा लढा सुरू राहील, असे मोठे विधान भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केले. यानंतर आता ठाकरे गटाने चित्रा वाघ आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘भावना गवळी जशा मोदींच्या दीदी झाल्या, तसे चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हावं’ असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच संजय राठोड यांची माफी मागावी असेही म्हटले आहे. ‘माणूस भाजपाकडे गेला की प्रकरण संपते, फाईल बंद होते, विषय संपून जातो. पण भाजपाला सोडून दुसरीकडे गेलात की प्रकरण चालू होते. फाईल उघडल्या जातात. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या या फक्त देवेंद्रजींनी सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात.

‘कधी आंदोलन करायचे, कधी थांबवायचं हे राजकीय हेतू पुरस्कृत असते. पूजा चव्हाणसारख्या मुलीला न्याय देण्यासाठी नसते. चित्रा वाघ यांनी विषय संपवला कसा?, क्लीन चिट कोणत्या आधारे दिली? त्यामुळे मला वाटते, त्यांनी संजय राठोड यांची माफी मागितली पाहिजे. जशा आमच्या भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं आता चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हायला हरकत नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ या अमरावती येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेत संजय राठोड यांच्यासंदर्भात भूमिका मांडली. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनाही विचारा, असा सवाल चित्रा वाघ यांनी माध्यमांना केला आहे.

०

Previous Post

पनवेलमध्ये भरणार रविवारी योजनांचा महामेळावा

Next Post

नेरूळ सेक्टर सहामधील आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नेरूळ सेक्टर सहामधील आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

नेरूळमध्ये सोमवारपासून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या दारी’

मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट : राहुल गांधी

मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट : राहुल गांधी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com