• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2021

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी विशेष समिती नेमा : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in Uncategorized
0
अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे  जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी विशेष समिती मागवून अहवाल मागविण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडी प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

राज्यात संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील रस्त्यांची दुरावस्था पर्यायाने दयनीय अवस्था झालेली आहे. मुळात पावसामुळे रस्त्यांची अवस्था ही पाऊसामुळे नाही तर रस्त्यांच्या डागडूजीकडे प्रशासनाने दाखविलेल्या उदासिनतेमुळे तसेच रस्ते कामात निकृष्ठपणा दाखविल्याने  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांना अखेरचा श्वास मोजावा लागण्याची वेळ आली आहे. दरवर्षी कोकणात गणेशोत्सवाला जाताना कोकणवासियांना सरकारी कृप्पेमुळे खड्डेमय रस्त्यांतूनच पाठीला  व मणक्यांना त्रास सहन करत ये-जा करावी  लागत आहे. मुंबई-गोवा  महामार्गाचे काम कधी पूर्ण होईल याची ठोस शाश्वतीही कोणी  देत नाही. दरवर्षी कोकणातील रस्ते वाहून जातात, कधी रस्त्यावरील  पुल वाहून जातात, रस्त्यावर खड्डे मोठे पडलेले असतात. कोकणवासियांनी असे कोणते पाप केले आहे की त्यांना चांगले  रस्ते सरकार उपलब्ध करून देवू शकत नाही. ठाणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातही रस्त्यांचा बोजवारा उडाला  आहे. ठाणे जिल्ह्यात खराब रस्त्यांमुळे  वाहतुक कोंडी नेहमीचीच समस्या झालेली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी राज्य सरकारने विशेष समिती नेमावी. तीन महिन्याची मुदत देत सरकारने समितीकडून आहवाल मागवावा आणि जानेवारी ते मे या ५ महिन्याच्या कालावधीत या  चारही जिल्ह्यातील रस्ते सुसज्ज व व्यवस्थित करावे. या चार जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी लवकरात लवकर विशेष समिती नेमण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Previous Post

छत्रपती संभाजीराजे उद्यान रहीवाशांसाठी खुले करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post

१०० केंद्रांवर ३० सप्टेंबरला १८ वर्षावरील नागरिकांसाठी २६ हजाराहून अधिक लसीकरणाचे नियोजन

Next Post
१०० केंद्रांवर ३० सप्टेंबरला १८ वर्षावरील नागरिकांसाठी २६ हजाराहून अधिक लसीकरणाचे नियोजन

१०० केंद्रांवर ३० सप्टेंबरला १८ वर्षावरील नागरिकांसाठी २६ हजाराहून अधिक लसीकरणाचे नियोजन

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा : नाना पटोले

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा : नाना पटोले

नवी मुंबईत लसीकरणाला गती देण्यासाठी जसलोक हॉस्पिटल व सिटी बॅंकेचा सामाजिक बांधिलकी जपत सहभाग

नवी मुंबईत कोरोनाचे आज ५६ रूग्ण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com