• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2021

फी विषयक समस्या न सुटल्यास तसेच मुजोर शाळांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार

adminbyadmin
in Uncategorized
0
अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

शालेय समस्यांबाबत एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
नवी मुंबई / ठाणे : कोरोना महामारीबाबत शालेय फीबाबत बुलढाणा जिल्ह्यासारखी माफी मिळावी तसेच फी वरून पालक-विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या मुजोर शाळांवर कारवाई याबाबत आठ दिवसात निर्णय न घेतला गेल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच आमरण उपोषण, अन्नत्याग तसेच बैठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रक काढून जिल्हाभरातील शाळांतील विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश दिले होते. तसेच आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील शाळांसाठी काढून मुलांना फी माफी द्यावी, वज्रेश्वरीतील डीव्हाईन ग्रेस, कल्याणमधील आर्य गुरूकुल, भिवंडीतील दि स्कॉलर या मुजोर शाळांची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, ज्या शाळा विद्यार्थ्यांकडून दडपशाहीने अकारण फी वसुली करत आहेत, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, आरटीईमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रवेशांना आडकाठी करण्यात येत आहे अशा तक्रारी असणाऱ्या सर्वच शाळांची चौकशी करून त्या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वज्रेश्वरीतील डीव्हाईन ग्रेस, कल्याणमधील आर्य गुरूकुल, भिवंडीतील दि स्कॉलर या तीन शाळांकडून फी, दाखला, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करणे, आरटीईचे प्रवेश नाकारणे यासह अन्य स्वरूपात पालकांसह विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्रास देण्यात आला आहे याचा हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात विस्तृतपणे पाढाच वाचला आहे. आपल्या मागण्यांवर व मुजोर शाळांवरील कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ८ दिवसाच्या आत निर्णय न घेतल्यास आपण त्यांच्याच दालनात लोकशाही पध्दतीने आमरण उपोषण, अन्नत्याग तसेच बैठे आंदोलन करणार असल्याचा इशारा हाजी शाहनवाझ खान यांनी दिला आहे.

Previous Post

इंधन, गॅसच्या किंमती वाढवून मोदी सरकारकडून जनतेचे रक्तशोषण : नाना पटोले

Next Post

कोरोनाचे आज नवी मुंबईत ६४ नवे रूग्ण, ३ मृत्यू

Next Post
तिसरी लाट लांबविण्याच्या दृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी टारगेटेड टेस्टींग वाढीवर भर

कोरोनाचे आज नवी मुंबईत ६४ नवे रूग्ण, ३ मृत्यू

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

नेपाळी वॉचमन व त्यांच्या परिवारासाठी तातडीने कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करा : सौ. सुजाता सुरज पाटील

अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

रत्नागिरी येथे मंजुर झालेल्या उर्दू भाषा भवनाची निर्मिती करा : हाजी शाहनवाज खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com