• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2021

लांडेवाडी येथील जनता दरबारात बैलगाडा मालकांसोबत शर्यतबंदी उठवण्याबाबत झाली चर्चा

adminbyadmin
in Uncategorized
0
लांडेवाडी येथील जनता दरबारात बैलगाडा मालकांसोबत शर्यतबंदी उठवण्याबाबत झाली चर्चा

मंचर : लांडेवाडी, ता. आंबेगाव येथील जनता दरबारामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध भागातील बैलगाडा मालकांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळरावपाटील यांची भेट देऊन बैलगाडी शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी आग्रही मागणी केली. यावेळी अनेक बैलगाडा मालकांनी त्यांच्या भावना शिवाजीराव आढळरावपाटील यांच्यासमोर व्यक्त करत यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येवून राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता बोलून दाखवली.

यावेळी उपस्थित गाडामालकांशी संवाद साधताना शिवाजीराव आढळरावपाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यती हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे. पाच न्यायाधिशांचे खंडपीठ याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयापुढे सामाजिक दृष्ट्या महत्वाचे ट्रिपल तलाक, राम मंदिर, आरक्षण, आधार कार्ड यासारखे विविध विषय आहेत. बैलगाडा शर्यतींचा विषय प्राधान्याने खंडपीठापुढे यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाला याविषयी जाग आणणे गरजेचे आहे. त्याकरिता संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेले सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्यासारख्या राज्यातील अनेक विविध प्रथितयश कलाकार मंडळी, कीर्तनकार, साहित्यकार, क्रीडा, सहकार या व अन्य क्षेत्रातील मंडळींना एकत्र करून राज्यव्यापी आंदोलन उभारल्यास सर्वोच्च न्यायालयाला आपली दखल घेणे भाग पडेल. तसेच यासाठी यासाठी ठिकठिकाणी ४-५ गावे मिळून एकत्रित शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. महिनाभर वातावरण निर्मिती करून योग्य दिशेने भव्य स्वरूपाचे जन आंदोलन केल्यास सर्वोच्च न्यायालयाला आपली दखल घेणे भाग पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्य व केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतींना विरोध केलेला नाही, मात्र कायदेशीर कचाट्यातून बैलगाडा शर्यत बाहेर काढणे गरजेचे आहे. सर्व गाडा मालकांच्या प्रतिनिधींनी गृहमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांची भेट घ्यावी, त्यादृष्टीने सोयीची एक तारीख निश्चित करून सर्व लोकप्रतिनिधी व गाडामालक यांची बैठक आयोजित करावी, बैठकीद्वारे आंदोलनाची दिशा निश्चित करावी अशा सूचना यावेळी मांडल्या. तसेच कुठल्याही नेतृत्वाशिवाय सर्वपक्षीयांना सोबत घेऊन हे आंदोलन व्हावे अशी भूमिका गाडा शिवाजीराव आढळरावपाटील यांनी मालकांसमोर मांडली.

Previous Post

श्रावणमासारंभानिमित्त शिवसेना शिववाहतुक सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप आमलेंकडून तुळशीच्या रोपांसह फळवाटप

Next Post

वाशी गावात क्रांतिदिनी स्व. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाची पेटली मशाल

Next Post
वाशी गावात क्रांतिदिनी स्व. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाची पेटली मशाल

वाशी गावात क्रांतिदिनी स्व. दि. बा. पाटील विमानतळाच्या नामकरणाची पेटली मशाल

मोदी सरकारच्या अन्याय, अत्याचाराविरोधात काँग्रेसचा ‘भाजपा चले जाव’चा नारा

काँग्रेसच्या उपक्रमांनाही कुणी का फिरकत नाही!

महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची इंटकची मागणी

शाळेच्या दाखल्यासाठी हजार रूपयाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करा : रवींद्र सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com