• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 24, 2021

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक त्रस्त : आ. रवींद्र चव्हाण

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिक त्रस्त : आ. रवींद्र चव्हाण

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com

डोंबिवली : दोन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना अडचणीचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने खड्ड्यांसाठी पुरेशा निधीची तजवीज केलेली असतानाही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने खड्डे बुजवावेत अन्यथा नागरिकाच्या सहनशिलतेचा अंत झाल्यास खड्ड्यातील दगड महापालिकेच्या दिशेने भिरकावण्यास वेळ लागणार नसल्याचा गंभीर इशारा भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्तांना दिला आहे.
दरवर्षीच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मुसळधार पाउस पडत असल्यामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर पडणारे खड्डे प्रशासनाच्या परिचयाचे आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी उच्च प्रतीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मास्टेक कार्पेट सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणे सहज शक्य असताना आणि पालिका अर्थसंकल्पात खड्ड्यासाठी कोट्यावधीची तरतूद करण्यात आलेली असताना पावसाळ्यापूर्वीच निविदा काढून खड्डे का भरले जात नाहीत असा प्रश्न आमदार रवींद्र चव्हाण यांनी विचारला आहे. यंदा शहरात पाउस खूप उशिरा सुरु झाला असतानाही शहरातील रस्त्याची चाळण झाली असून याला कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे सुस्त प्रशासन आणि बेदरकार वृत्ती जबाबदार आहे.
  डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काम अजूनही सुरु आहे. हा पूल  ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला केल्यास वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी होऊ शकेल. यामुळे संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती दिली जावी.
खड्ड्यात पडून कल्याण डोंबिवलीतील अपघात होण्याचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक आहे.
  यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे, इतस्त्तः पडलेले दगड धोंडे यामुळे वाहतूक खोळंबा तर होतोच पण रस्त्यावर पसरलेल्या दगडांनी वाहनचालक गंभीर जखमी झालेत आणि नागरिकांचे बळीही खड्ड्यांनी घेतले आहेत. याकरिता महापालिका प्रशासन दोषी आहेच पण दुर्दैव असे की झालेल्या घटनांमधून पालिका प्रशासन काहीच बोध घेत नाही एवढी यंत्रणा संवेदनाहीन, निष्काळजी आणि मुर्दाड झालेली आहे. यामुळेच नागरिकाचा अंत पाहू नका असेही आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

Previous Post

प्रभाग ९६ मध्ये महापालिकेकडून ब्लिचिंग पावडरच्या फवारणीस प्रारंभ

Next Post

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करावी : नाना पटोले

Next Post
धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करावी : नाना पटोले

माणिकराव जगतापांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला : नाना पटोले

माणिकराव जगतापांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला : नाना पटोले

पाँर्न अँप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्सतर्फे झाडाझडती करा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com