• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2021

विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अट शिथिल करून अन्य सक्षम पुरावे ग्राह्य धरण्याची राष्ट्रवादीची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत यांनी केली मनपा आयुक्तांकडे निवेदनातून मागणी

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : कोरोना महामारीत मृत झालेल्या कुटूंबियातील विधवा महिला व त्यांच्या मुलांना मदतीसाठी लागू केलेल्या योजनेतील विवाह नोंदणी प्रमाणपत्राबाबतची जाचक अट शिथिल करून त्याऐवजी अन्य सक्षम पुरावे ग्राह्य मानण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे  एका लेखी निवेदनातून केली आहे.

कोरोना महामारीची किंमत सर्व जगाला चुकवावी लागलेली आहे. नवी मुंबईही त्याला अपवाद नाही. कोरोना महामारीत अनेक जण मृत झाल्याने नवी मुंबईतही अनेक परिवार उध्दवस्त झाले आहेत. मुले अनाथ झाली आहे. महिलांना पती गेल्याने वैधव्य आलेले आहे. कोरोनामुळे तरूण मुले गमावावी लागल्याने वयस्क माता-पित्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लोकल्याणकारी भूमिकेतून विधवा महिलांना दीड लाखाची मदत, मुलांना २१ वयोगटापर्यत शैक्षणिक मदतीसाठी दर महिन्याला आर्थिक मदत, दोन टप्प्यात एक लाख रूपयांचे अर्थसहाय्य यांचा समावेश आहे. परंतु त्यात महापालिका प्रशासनाने विवाह नोंदणी प्रमाणपत्राची ठेवलेली अट यामुळे नवी मुंबईतील किमान ९५ टक्के संबंधित परिवारांना या योजनेचा लाभ घेण्यात अडथळा ठरू लागलेली असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

महिलांचे विवाह दोन-अडीच दशकापूर्वी झालेले असल्याने त्यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नाही. परंतु कोरोना महामारीत मयत झालेले नवी मुंबईकर आहेत. नवी मुंबई महापालिकेचे करदाते आहेत. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेल तर त्या नवरा बायकोचे बॅकेतील संयुक्त खाते, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, निवडणूक आयोगाचे ओळख प्रमाणपत्र यापैकी अन्य सक्षम पुरावा महापालिकेने ग्राह्य धरून विधवा महिला व त्यांच्या मुलांना मदत करण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा. कारण महापालिकेने मदतीचा निर्णय आता घेतला आहे. परंतु अन्य पुरावे पूर्वीचे आहेत. त्यामुळे महापालिकेला कोरोनाने आपत्ती कोसळलेल्या नवी मुंबईकरांच्या परिवाराला मनापासून मदत करायची असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अट शिथिल करून अन्य सक्षम पुरावे ग्राह्य मानून संबंधितांना जाहिर केलेल्या योजनांची मदत देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना? : आ. आशिष शेलार

Next Post

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये साई भक्त महिला फांऊडेशनची आषाढी वारी उत्साहात

Next Post
सानपाडा प्रभाग ७६ मध्ये साई भक्त महिला फांऊडेशनची आषाढी वारी उत्साहात

सानपाडा प्रभाग ७६ मध्ये साई भक्त महिला फांऊडेशनची आषाढी वारी उत्साहात

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

नवी मुंबईत आज कोरोनाचे ९९ रूग्ण, २ मृत्यू

पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन २०२१ चे मानकरी

पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन २०२१ चे मानकरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com