• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 5, 2019

मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक करण्याचा धंदा बंद करावाः सचिन सावंत

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचारः सचिन सावंत
गेली काही वर्षे कॉंग्रेसची ठोस भूमिका सातत्याने परखडपणे मांडणारी सचिन सावंत नावाची मुलुखमैदानी तोफ
  • एकरी मदत जाहीर केल्याशिवाय तरतूद हा शब्द अर्थशून्य
  • मुख्यमंत्री NDRF ची नव्हे तर ED ची मदत मागण्यासाठी गेले होते
  • १० हजार कोटींची तरतूद कुठे केली ते दाखवा?

मुंबई : गेल्या पाच वर्षात जनतेची फसवणूक करण्याचा धंदा राज्यातील सरकारने चालवला आहे तो निदान आता तरी बंद करावा. एकरी मदत जाहीर केल्याशिवाय तरतूद हा शब्द अर्थशून्य असून १० हजार कोटींची तरतूद केल्याचा सरकारी आदेश दाखवावा असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु नाही त्यामुळे पुरवणी मागण्यांचा प्रश्न येत नाही. मदत आणि पुनर्वसन विभागाचे बजेट यथातथाच आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रूपयांची तरतूद केली असे जाहीर केले, ते पूर्णपणे जनतेची दिशाभूल करणारी असून हा आदेश अद्यापही निघाला नाही. राज्याचा आपत्कालीन निधी फक्त १५० कोटी रूपयांचा आहे. तो वाढवून देण्याचा आदेश देखील निर्गमीत झालेला नाही, तसेच शासकीय परिभाषेनुसार ही अवकाळी पावसाने झालेले नुकसान आपत्कालीन परिस्थितीमध्ये गृहीत धरले जात नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे चर्चा केली हा पूर्णपणे दिखावा आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी राज्यावरील नव्हे भाजपवरील आपत्तीची चर्चा केली असून NDRF ची नव्हे तर ED ची मदत मागण्यासाठी गेले होते. असे नसेल तर महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे किती कोटींच्या मदतीची मागणी केली ते सांगावे. याहूनही गंभीर बाब ही की शासनाने अद्याप प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी किती मदत देणार ते जाहीर केलेले नाही त्यामुळे १० हजार कोटी रूपयांची तरतूद हा विषय अर्थशून्य आहे असे सावंत म्हणाले.  

Previous Post

आ.सौ.मंदा म्हात्रे यांची भाजपा नगरसेवकांसमवेत महापालिका आयुक्तांबरोबर भेट

Next Post

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी हळव्या मनाच्या संवेदनशील आमदार मंदाताईं म्हात्रेंचा पुढाकार

Next Post
भाजप उमेदवार मंदाताई म्हात्रेंच्या प्रचारासाठी शुक्रवारी सारसोळे, कुकशेतला प्रचार रॅली

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी हळव्या मनाच्या संवेदनशील आमदार मंदाताईं म्हात्रेंचा पुढाकार

तुर्भे स्काय वॉक साठी नगरसेवक सुरेश कुलकर्णींचा रास्ता रोकोचा इशारा

तुर्भे स्काय वॉक साठी नगरसेवक सुरेश कुलकर्णींचा रास्ता रोकोचा इशारा

सततच्या वादळांमुळे बोबिंल, पापलेट, सुरमईला सोन्याचा भाव

सततच्या वादळांमुळे बोबिंल, पापलेट, सुरमईला सोन्याचा भाव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com