• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 24, 2019

जनतेने सत्तेचा माज उतरवलाः सचिन सावंत

adminbyadmin
in Uncategorized
0
शिवसेनेची भूमिका सत्ता संपादनात ठरणार महत्वाची
सचिन सावंतांनी मांडली कॉंग्रेसची परखड भूमिका व व्यक्त केले सडेतोड मत

पुन्हा संघर्ष करण्याकरिता उर्जा देणारा निकाल

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालातून जनतेने सत्ताधा-यांचा सत्तेचा माज उतरवला असून विरोधी पक्ष दिसत नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना अधिक ताकदवर विरोधी पक्षाचे दर्शन जनतेने करून दिले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, गेली ५ वर्ष सातत्याने विविध निवडणुकांमध्ये एकतर्फी निर्णय येत होता. परंतु हा निकाल पुन्हा उभारी देणारा व भाजप शिवसेनेच्या हुकुमशाही विरोधात संघर्ष करण्याकरिता ऊर्जा देणारा आहे. गेली पाच वर्ष सातत्याने सत्ताधा-यांनी लोकशाही विरोधी भूमिका घेऊन राज्य केले आहे. साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याकरिता यंत्रणांचा वापर आणि विरोधी पक्ष फोडण्याकरिता सर्व अनैतिक मार्गांचा उपयोग या सरकारने केला. सत्ताधा-यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये राज्यातील मुलभूत प्रश्नांना बगल देण्याकरिता स्वतःचे मुद्दे लादले हे जनतेला आवडलेले नाही. जनतेच्या विरोधातही दडपशाहीचा मार्ग या सरकारने स्वीकारला होता, हे आरे कॉलनी असेल वा अन्य ठिकाणी पहायला मिळाले. एके ठिकाणी प्रचंड आक्रोश असताना सत्ताधा-यांची वक्तव्ये ही अहंगंड दर्शवणारी होती. जनतेने हा अहंकार मोडून काढला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजकारण हे भाजपला मदत करणारे आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी ही मतांपासून कायम वंचीत होईल हे ही या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. जनतेला गृहीत धरू नये हा संदेश सत्ताधा-यांना जनतेने दिला असून काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मनोबल वाढवणारी ही जनतेची मन की बात आहे.
या निवडणुकीतून स्वतःच्या स्वार्थाकरिता पक्ष आणि विचारधारेंचा त्याग करणा-यांनादेखील जनतेने धडा शिकवला आहे. अनेक मंत्री तर पडलेच तर स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री घोषीत करणा-याही पडल्या यातून जनतेच्या मनातील असंतोष किती मोठ्या प्रमाणात होता हे दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या यशाचा काँग्रेस पक्षाला आनंद आहे आणि काँग्रेसची विचारधारा पुन्हा मजबूत होत आहे याचे समाधान आहे. या पुढील काळात काँग्रेस समविचारी पक्षांच्या मदतीने भाजपच्या अनैतिक व हुकुमशाही मानसिकतेचा निकराने विरोध करत राहील असे सावंत म्हणाले.  

Previous Post

शिवसेनेची भूमिका सत्ता संपादनात ठरणार महत्वाची

Next Post

कांतीलाल कडू यांच्या घरासमोर दंगल घडविण्याचा कट उधळला

Next Post
कांतीलाल कडू यांच्या घरासमोर दंगल घडविण्याचा कट उधळला

कांतीलाल कडू यांच्या घरासमोर दंगल घडविण्याचा कट उधळला

लोकनेते गणेश नाईक यांचा ७८,४९१ मताधिक्यांनी दणदणीत विजय!

लोकनेते गणेश नाईक यांचा ७८,४९१ मताधिक्यांनी दणदणीत विजय!

शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहेः आ. बाळासाहेब थोरात

जनतेचा कौल मान्य!: आ. बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com