• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 10, 2019

‘रिव्हर अँथम’मुळे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या? सचिन सावंत

adminbyadmin
in मुंबई
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात !

स्वयंम न्युज ब्युरो

मुंबई : आषाढी वारीच्या तोंडावर देहू नगरीतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली गाणी गाण्यापेक्षा नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एखादा ठोस कार्यक्रम हाती घेतला असता तर ही घटना झाली नसती, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

इंद्रायणी नदीत मृत मासे सापडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत पुढे म्हणाले की, आषाढीवारी निमित्त लाखो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. मात्र, नदीत मैलायुक्त सांडपाणी व रासायनिक पाणी सोडले जात असल्यामुळेच या नदीचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. अशा प्रदुषित पाण्यात वारकऱ्यांनी स्नान कसे करायचे, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

‘रिव्हर अँथम’च्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांना संगिताच्या तालावर ठेका धरायला लावला. यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री कार्यालयाने नद्यांसंदर्भात अनेक स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन रिव्हर ऍथॉरिटी स्थापन करू असे म्हटले होते. त्याचे काय झाले ? नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काही उपयोग झालेला तर दिसत नाही, म्हणजे रिव्हर अँथम हा केवळ करमणुकीचा भाग होता का ? असे सावंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी असे इव्हेंट आणि स्टंट करण्यापेक्षा नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा. तसे केले नसल्यामुळेच इंद्रायणीसारख्या नद्यांचे पावित्र्य आता धोक्यात आले आहे. अजूनही वेळ गेलेली नसून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा आणि प्रदुषणाच्या विळख्यातून नद्यांची सुटका करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Previous Post

भाजप नव्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शोधात?

Next Post

कारभार सुधारा, अन्यथा जनआंदोलन! आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला सणसणीत इशारा

Next Post
कारभार सुधारा, अन्यथा जनआंदोलन! आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला सणसणीत इशारा

कारभार सुधारा, अन्यथा जनआंदोलन! आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला सणसणीत इशारा

मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

पहिल्याच पावसात पथदिवा उखडला

पहिल्याच पावसात पथदिवा उखडला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com