• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 31, 2019

विश्वस्त या भावनेतून सरकारचे काम – मुख्यमंत्री फडणवीस

adminbyadmin
in नवी मुंबई
0
विश्वस्त या भावनेतून सरकारचे काम – मुख्यमंत्री फडणवीस

????????????????????????????????????

स्वयंम पीआर एजंन्सी

नवी मुंबई : सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

श्री गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्था नवी मुंबई आयोजित नवी मुंबई उत्सव २०१९ चे उदघाटन ना.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळीमाजी राज्यपाल डॉ.डी वाय पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सिडकोचे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आ.रमेश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, विजय चौगुले, आ.मंदाताई म्हात्रे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

कै.गणपतशेट तांडेल मैदान, नेरुळ येथे हा शानदार कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोवर्धिनी संस्थेच्यावतीने ११ लाख रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोटद्वारे महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर आ.मंदाताई म्हात्रे यांच्या कार्य अहवालाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई खाडी पुलावरून खाडीत पडलेल्या लोकांना वाचविणाऱ्या महेश अशोक सुतार यांचा तसेच सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतात ना.फडणवीस म्हणाले की, कार्य अहवाल म्हणजे निवडून आल्यानंतर लोकांना केलेल्या कामांची दिलेली छापील माहिती, रामभाऊ म्हाळगी यांनी ही परंपरा सुरू केली. ज्या जनतेने आपणाला विश्वासाने निवडून दिले. त्यांच्यासाठी काय केलं याची माहिती त्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे. आ.मंदाताई म्हात्रे यांनी हा अहवाल प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करून त्यांनी नवी मुंबई महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई उत्सवाच्या निमित्ताने जनतेचे एकत्रीकरण होणे ही चांगली बाब आहे,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शंकर महादेवन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिषेक कांबळे, युक्ता पाटील, सई जोशी आदी कलाकारांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे यांनी केले. या कार्यक्रमास भाजप नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व नवी मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दिव्यांग व्यक्तीस स्वंयरोजगाराच्या जागा प्रतिक्षा यादीसाठीच्या प्रक्रियेला मुदतवाढदेण्याची काँग्रेसची मागणी

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या विजयाने हुरळून न जाण्याचा फडणवीस सरकारला इशारा

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

लोकसभा निवडणुकीच्या विजयाने हुरळून न जाण्याचा फडणवीस सरकारला इशारा

वंचित आघाडीला महाआघाडीत यायचेच नव्हते : लोकनेते गणेश नाईक

वंचित आघाडीला महाआघाडीत यायचेच नव्हते : लोकनेते गणेश नाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक!: सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com