• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 29, 2019

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यंमंत्र्याच्या प्रामाणिकतेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्हः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

मुख्यमंत्री राज्याचे नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत!

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निर्घृण खुनासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीसंदर्भात उच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास यंत्रणा व महाराष्ट्र सरकारने दाखवलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र असमाधान व्यक्त करून मुख्यमंत्री राज्याचे आहेत की फक्त एका राजकीय पक्षाचे आहेत? असा संतप्त सवाल करून मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. महाराष्ट्राकरिता ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, उच्च न्यायालयाला अशा तीव्र शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त करावी लागली याचे कारण राज्याचे मुख्यमंत्री संविधानाप्रमाणे नाही तर संघाच्या विचारधारेनुसार काम करत आहेत. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री हे पूर्णपणे अपयशी व कार्यक्षम ठरले आहेत. संघ विचारधारा ही कायम संविधान विरोधी राहिलेली आहे. आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्याकरिता संघ कोणत्याही थराला जाऊ शकतो. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे कायम संघ विचारधारेच्या विरोधात लढले. त्यामुळेच त्यांच्या मारेक-यापर्यंत पोहोचण्यात सरकारला रस नाही असे दिसत आहे.

मुंबईजवळ नालासोपारा येथे सापडलेल्या बॉम्बसाठ्या प्रकरणी तपासाचे धागेदोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सांगण्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक तपास मंद करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत. असा गंभीर ठपका इंडिया स्कूप नावाच्या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टमध्ये मुख्यमंत्र्यांवर ठेवला आहे. काँग्रेस पक्षाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितले होते जे त्यांनी अद्यापही दिले नाही. उच्च न्यायालयाच्या वक्तव्यावरून हा रिपोर्ट सत्यच होता हे स्पष्ट झाला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

Previous Post

निवडणूक ठाणे लोकसभेची, पण प्रतिष्ठा पणाला लागली नाईक परिवाराची

Next Post

आघाडीच्या प्रचारयंत्रणेला मिळणार आता उघडपणे मनसेचा टेकू

Next Post
कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला पाहिजे निवडणूकीसाठी राजची ‘मनसे’ संजीवनी?

आघाडीच्या प्रचारयंत्रणेला मिळणार आता उघडपणे मनसेचा टेकू

सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?

सर्वच राज्यात कॉंग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग असताना महाराष्ट्रातच आऊटगोईंग कशी?

शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला… आशीष शेलारांचा मनसेला चिमटा

शिवाजी पार्कात एक शून्य दुसऱ्या शुन्याला भेटला... आशीष शेलारांचा मनसेला चिमटा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com