• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2019

जलवाहिनी फुटल्याने उल्हासनगरात लाखो लीटर पाणी वाया

adminbyadmin
in ठाणे
0
जलवाहिनी फुटल्याने उल्हासनगरात लाखो लीटर पाणी वाया

अॅड, महेश जाधव

कल्याण : उन्हाळ्याचे दिवस सुरू होण्यास आठवडाच उरला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात दुष्काळामुळे आताच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शुक्रवारी उल्हासनगरमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जाण्याची घटना घडली आहे. उल्हासनगर येथील भरतनगर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम वेगाने सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. यामुळे आधीच पाणीटंचाईने ग्रासलेल्या लोकांना दुष्काळात तेरावा महिना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. अचानक फुटलेल्या जलवाहिनीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. एमआयडीसी मार्फत रस्त्याचे खोदकाम होत असताना अनेकदा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

उल्हासनगर – ४ येथील सिमेंट काँक्रीटकरण रस्त्याच्या कामात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याठिकाणी होत आहे. याशिवाय जवळपास हजाराहून अधिक नागरीकांनी घेतलेल्या नळजोडण्या या रस्त्याच्या कामामुळे तुटल्या गेल्याने त्यातून देखील मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. सकाळ संध्याकाळ फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी वाहत असल्यामुळे भरतनगर परिसरात तलावाचे स्वरूप निर्माण झाले. याशिवाय फुटलेल्या जलवाहिनीतून माती आणि इतर सांडपाणी जात असल्यामुळे परिसरातील नागरीकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याचे खोदकाम करताना कोणतीही दक्षता घेतली जात नसल्यामुळे ती पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्या गेल्याने होणाऱ्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष केले जात आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी थांबविण्यासाठी नागरीकांनी प्लास्टिक लावून पाण्याची गळती थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Previous Post

नेरूळमधील वंडर्स पार्क येथे तेरावे झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शनाचा शुभारंभ

Next Post

माझा तोफखाना तयार आहे, आचारसंहिता लागण्याची वाट बघतो आहे – राज ठाकरे

Next Post
कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला पाहिजे निवडणूकीसाठी राजची ‘मनसे’ संजीवनी?

माझा तोफखाना तयार आहे, आचारसंहिता लागण्याची वाट बघतो आहे - राज ठाकरे

नवी मुंबईकरांमध्ये लोकनेते गणेश नाईकांच्या ‘फिटनेस’चीच चर्चा

नवी मुंबईकरांमध्ये लोकनेते गणेश नाईकांच्या ‘फिटनेस’चीच चर्चा

अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा हायटेक प्रचार

लोकसभेच्या निवडणूकांसाठी ‘बुथ जिंकाल तर निवडणूक जिंकाल’ भाजपचा फंडा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com