• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2019

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा: खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा: खा. अशोक चव्हाण

काँग्रेस मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मुंबई : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन खा. चव्हाण म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे सरकार संविधानाला पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार करत आहे. संविधानीक संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून सामाजिक वातावरण गढूळ करून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे. दलित, अल्पसंख्यांकांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले असून संविधान वाचले तरच हा देश वाचेल.  या सरकारच्या काळात संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने या लोकविरोधी भाजप शिवसेना सरकारविरुद्ध जनसंघर्ष सुरु केला आहे. राज्यभरात साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून काल भिवंडी येथे जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला पण संघर्ष थांबवलेला नाही. केंद्रातील आणि राज्यातील खोटारडे, हुकुमशाही वृत्तीचे सरकार घालवल्याशिवाय तो थांबणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टिळक भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, खा. हुसेन दलवाई, आ. शरद रणपिसे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी खा. एकनाथ गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील,  प्रवक्ते सचिन सावंत, यशवंत हाप्पे, रमेश शेट्टी, राजन भोसले, राजेश शर्मा, पृथ्वीराज साठे, अभिजीत सपकाळ, सचिव शाह आलम शेख यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

Next Post

शिवसेना शाखा ८५ व ८६च्या वतीने दंत व नेत्र तपासणी उत्साहात

Next Post
शिवसेना शाखा ८५ व ८६च्या वतीने दंत व नेत्र तपासणी उत्साहात

शिवसेना शाखा ८५ व ८६च्या वतीने दंत व नेत्र तपासणी उत्साहात

गोदावरी सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

गोदावरी सोसायटीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

मॉलमधील तळघरातील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत विशेष मोहीम राबविण्याची इंटकची मागणी

मॉलमधील तळघरातील कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत विशेष मोहीम राबविण्याची इंटकची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com