• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 9, 2019

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा १२जानेवारी रोजी नवी मुंबईत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा १२जानेवारी रोजी नवी मुंबईत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांची माहिती
नवी मुंबई : केवळ चुनावी जुमले देवून फसवणूक करणार्‍या राज्यातील आणि केंद्रातील भाजपाप्रणित सरकारला जनता विटली असून ती आता सत्ताबदलाच्या माध्यमातून परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे. या बदलत्या मानसिकतेला प्रतिबिंबीत करण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निर्धार परिवर्तन यात्रा १० जानेवारीपासून काढण्यात येणार आहे. ही यात्रा १२ जानेवारी रोजी नवी मुंबईत येणार असून या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची जाहिर  सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी दिली आहे.
निर्धार परिवर्तन यात्रेच्या नवी मुंबईतील संपर्क यात्रेची तयारी करण्यासाठी रविवारी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, प्रदेश चिटणीस भालचंद्र नलावडे, नवी मुंबई अल्पसंख्याक सेलचे प्रमुख ऍड जब्बार खान, श्याम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावर महाराजांना नमन करुन या यात्रेचा प्रारंभ १० जानेवारी रोजी  होणार आहे. १२ जानेवारी रोजी ही यात्रा नवी मुंबईत येणार असून सायंकाळी ५ वाजता कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानात पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांची जाहिर सभा होणार आहे. ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, लोकनेते गणेश नाईक, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
अलिकडेच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपाचा दारुन पराभव झाला.  यावरुन हेच सिध्द होते की आता जनतेला बदल हवा आहे. शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे प्रश्‍न हे सरकार सोडवू शकले नाही. इंधन दरवाढ होतेच आहे. जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. बेरोजगारी आहे. सर्व आघाडयांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांची ही फसवेगिरी या निर्धार परिवर्तन यात्रेतून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे, असे सांगून  पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील पक्ष संघटनेच्या दृष्टीकोणातून कामाला लागावे, असे आवाहन डॉ.संजीव नाईक याप्रसंगी केले. आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार आणि जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले
Previous Post

सिवूडस मध्ये ओपन जिमचे उदघाटन उत्साहात

Next Post

 स्तर सोडलेले राजकारण 

Next Post
 स्तर सोडलेले राजकारण 

 स्तर सोडलेले राजकारण 

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

अतिक्रमण विभागाच्या अकार्यक्षम कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सत्काराची मागितली वेळ

दोन तासाच्या अथक प्रयासानंतर मेरेडीयनची आग आटोक्यात

दोन तासाच्या अथक प्रयासानंतर मेरेडीयनची आग आटोक्यात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com