• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2018

बिल्डरांकडून ताब्यात घेतली एसआरएने ४५० घरे

adminbyadmin
in मुंबई
0
बिल्डरांकडून ताब्यात घेतली एसआरएने  ४५० घरे

अवघ्या ६ महिन्यात झाली कारवाई

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास योजने(एसआरए)अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पीएपी अर्थात प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेली ४५० घरे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा (एसआरए)ने बिल्डरांकडून ताब्यात घेतली आहे.

गेल्या सहा महिन्यांत ही घरे ताब्यात घेण्यात आली असून आता जशी प्रकल्पग्रस्तांना गरज लागेल तशी ही घरे वितरीत केली जातील, अशी माहिती एसआरएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे पीएपीएची घरे ताब्यात घेत त्याचे व्यवस्थापन, वितरण आणि देखरेख करण्यासाठी स्वतंत्र इस्टेट विभाग स्थापन केल्यानंतर ४५० घरे ताब्यात घेण्यात एसआरएला यश मिळाले आहे.

एसआरए योजनेत जितके झोपडीधारक असतात, तितकी घरे बिल्डरला बांधावी लागतात. त्यानुसार जे झोपडीधारक पात्र ठरतात, त्यांना घराचे वितरण करत अपात्र झोपडीधारकांची घर पीएपी म्हणून एसआरएच्या ताब्यात द्यावी लागतात. मग एसआरए प्रकल्पबाधितांसाठी वा एखाद्या एसआरए योजनेतील पात्र झोपडीधारकांसाठी घरे कमी पडत असतील तर त्यांना ही घरे देतात. असे असताना अनेक बिल्डर ही पीएपीची घर एसआरच्या ताब्यातच देत नाहीत, घर देण्यास टाळाटाळ करतात, घरे भाड्याने देतात वा या घरांत घुसखोरी होते असे चित्र आहे.

एकीकडे बिल्डर पीएपीची घर देत नसतानाच दुसरीकडे एसआरएकडे ही घरे ताब्यात घेण्यासाठी आणि घरांच्या व्यवस्थापन-वितरण-देखभालीसाठी यंत्रणाच नाही. त्यामुळेही एसआरए उदासीनता दाखवत होती आणि त्यामुळेच बिल्डरांचं फावत होतं. ही बाब लक्षात घेत एसआरएने आठ महिन्यांपूर्वी स्वतंत्र अशा इस्टेट विभागाची स्थापना केली.

या विभागावर घर ताब्यात घेत, घराच्या वितरण-व्यवस्थापन-देखभालीची जबाबदारी टाकली आहे. घर ताब्यात घेतल्यास त्यात घुसखोरी होईल ही भीतीही एसआरएला होती. त्यानुसार ताब्यात घेतलेल्या घरांमध्ये घुसखोरी होऊ नये ही जबाबदारीही या इस्टेट विभागावर असणार आहे.

हा विभाग कार्यान्वित झाल्यापासून विभागाने ४५० घरे ताब्यात घेतली आहेत. जे बिल्डर घर ताब्यात घेण्यास टाळाटाळ करत आहेत, त्या बिल्डरांविरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करत, गुन्हे दाखल करत ही घरे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यानंदिली आहे. तर सहा महिन्यांत ४५० घर ताब्यात येणे ही मोठी बाब असून येत्या काळात बिल्डरांना दणका देत मोठ्या प्रमाणावर घर ताब्यात घेण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

Previous Post

भाजपला पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य महत्त्वाचं – शिवसेना

Next Post

अर्थव्यवस्था मजबुत करण्यात मराठी उद्योजकांचेही मोठे योगदान : उद्योजक संग्राम पाटील

Next Post
अर्थव्यवस्था मजबुत करण्यात मराठी उद्योजकांचेही मोठे योगदान : उद्योजक संग्राम पाटील

अर्थव्यवस्था मजबुत करण्यात मराठी उद्योजकांचेही मोठे योगदान : उद्योजक संग्राम पाटील

गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा

गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा

बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले

बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com