• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 3, 2018

२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणारः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणारः खा. अशोक चव्हाण

काँग्रेस नेत्यांनी फोडली भाजपच्या पापाची हंडी!

जनसंघर्ष यात्रेला जनतेचा प्रचंड पाठिंबा, गावोगावी जंगी स्वागत

सातारा : भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीति संगम या समाधीस्थळी अभिवादन करून झाली. त्यानंतर जनसंघर्ष यात्रेत सहभागी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडली. त्यानंतर रहिमतपूर येथे जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, भाजप सरकारच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती झाली आहे. चार वर्षात घोटाळे करण्याशिवाय आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे या सरकारने काही केले नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या करित आहेत. बेरोजगारीला कंटाळून सुशिक्षित बेरोजगार तरूण आत्महत्या करित आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व इतर समाजातील तरूण आत्महत्या करित आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार प्रश्न चिघळवत ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरु आहे. या सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. काँग्रेस पक्षाने सरकारच्या भ्रष्टाचारांची हांडी फोडली असून २०१९ च्या निवडणुकीत जनता या सरकारच्या पापाची हांडी फोडेल असे खा. चव्हाण म्हणाले.

यावेळी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात. या सरकारची धोरणे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताची नाहीत तर फक्त देशातल्या मुठभर उद्योगपतींच्या हिताची आहेत. नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वसामान्यांचे अच्छे दिन आणायचे असतील तर भाजप सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागेल असे चव्हाण म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, आ. डी. पी. सावंत आ. अमर राजूरकर, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. जयकुमार गोरे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, आ. अमर काळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे प्रदेश काँग्रेसचे सोशल मिडीया विभागाचे प्रमुख व प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेनंतर पुढे म्हसवड कडे जाताना संघर्ष यात्रेत सहभागी काँग्रेस नेत्यांनी मौजे गोपुज येथे शेतक-यांच्या शेतात भोजन केले व शेतक-यांशी संवाद साधला.

जनसंघर्ष यात्रा उद्या दि. ४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर अक्कलकोट या शहरांत जाणार आहे.

 

Previous Post

मुंबई : तिनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

Next Post

अनधिकृत मार्केट उभारणीचा खर्च पालिका अधिकार्‍यांकडून वसूल करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Next Post
पालिकेच्या अनधिकृत मार्केटचे डेब्रिज हटविण्यास पालिकेकडून सुरूवात

अनधिकृत मार्केट उभारणीचा खर्च पालिका अधिकार्‍यांकडून वसूल करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

भाजपाचा नारा बेटी बचाव नव्हे, तर बेटी भगाव; शिवसेनेची राम कदमांवर खरमरीत टीका

भाजपाचा नारा बेटी बचाव नव्हे, तर बेटी भगाव; शिवसेनेची राम कदमांवर खरमरीत टीका

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या एक तासासाठी बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे उद्या एक तासासाठी बंद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com