• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 8, 2018

ब्रिस्टॉलच्या मैदानात ७ गडी राखून भारत विजयी

adminbyadmin
in देश - विदेश
0
ब्रिस्टॉलच्या मैदानात  ७ गडी राखून भारत विजयी

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने केलेल्या आक्रमक शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेलं १९९ धावांचं आव्हान भारताने रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. रोहितने ५६ चेेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने ११ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले. इंग्लंडचे सर्व गोलंदाज आज रोहितसमोर निष्प्रभ ठरले. सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने लोकेश राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या सोबत छोटेखानी भागीदाऱ्या रचत संघाला विजय मिळवून दिला. विराट आणि हार्दिक पांड्यानेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडकडून डेव्हिड विली, जेक बॉल आणि ख्रिस जॉर्डन यांनी १-१ बळी घेतला.

या विजयासह भारताने आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. यानंतर होणाऱ्या वन-डे व कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ अशीच कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गुरुवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे.

तत्पुर्वी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच उलटला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत १९८ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. विशेषकरुन रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत सर्वच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन रॉयने ३१ चेंडूंमध्ये ६७ धावांची खेळी केली. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार मॉर्गन लवकर माघारी परतला. मात्र यानंतर प्रत्येक इंग्लिश फलंदाजाने आपल्या वाटेला आलेली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला.

आज गोलंदाजीसोबत भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चांगलीच निराशा केली. हार्दिक पांड्याला सामन्यात सर्वाधिक ४ बळी मिळाले, मात्र यासाठी त्याला ३८ धावा मोजाव्या लागल्या. याव्यतिरीक्त सिद्धार्थ कौलने २ तर दिपक चहर आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Previous Post

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवनाचे लोकार्पण येत्या जयंतीचे औचित्य साधून करा

Next Post

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

Next Post
जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

तर मनुस्मृतीला संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करा!

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

माध्यमांनी विधिमंडळाचे कामकाज तटस्थपणे मांडावे - गजानन निमदेव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com