• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 8, 2018

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवनाचे लोकार्पण येत्या जयंतीचे औचित्य साधून करा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भवनाचे लोकार्पण येत्या जयंतीचे औचित्य साधून करा

 जय लहुजी सामाजिक संस्थेची मागणी

अमोल इंगळे
नवी मुंबई : नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मातंग समाजाचे बांधव वास्तव्यास आहेत.मातंग समाजाला एक संघ आणि त्यांच्या वैचारिक विचारणीला एकत्रितपणे न्याय मिळवा. समाजाला एक वास्तू मिळावी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव असे नवी मुंबईतही सर्वांच्या मनात तेवत राहो या उद्देशाने जुईनगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक भवन उभारण्यात आले आहे. या वास्तूचे काम पूर्ण झाले असून येत्या १ ऑगस्ट २०१८ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकार्पण करावे अशी मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेच्या वतीने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामी एन ,महापौर जयवंत सुतार आणि यांच्या सह सर्व प्रमुख सदस्यांना लेखी निवेदन करून करण्यात आले आहे. जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग व्यंकट शिंदे यांनी ६ जुलै रोजी लेखी निवेदन दिले आहे. नवी मुंबई महापालिकेने मातंग समाजाचे दैवत असणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक नवी मुंबईत उभारावे यासाठी संस्थेच्या वतीने लोकनेते गणेश नाईक यांना पालकमंत्री असताना लेखी निवेदन सादर केले होते.त्याबरोबर तत्कालीन महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे यांना लेखी निवेदन दिले होते.नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सानपाडा (जुईनगर) सेक्टर १० येथील भूखंड क्रमांक १८७ येथे ६ कोटी २५ लाख ६४ हजार रुपये खर्चून समाजभवन उभारले आहे .या समाजभवनाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून याचे उदघाटन न झाल्याने समाज बांधवांनी तसेच जय लहुजी सामाजिक संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे.समाज भवनाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करून मातंग समाजाला न्याय द्यावा तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ द्यावे अशी मागणी जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग शिंदे यांनी केली आहे .येत्या १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून महिनाभर संपूर्ण देशभर यानिमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात. त्या नुसार १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नवी मुंबई महापालिकेचे समाज भवन मातंग समाजासाठी खुले करावे अशी मागणी केली आहे.त्याच बरोबर मुंबई, ठाणे पुणे या प्रगत महापालिकांच्या प्रमाणे देशभरात आपला ठसा उठविणाऱ्या नवी मुंबईत महानगरपालिकेने देखील १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विशेष निधी आरक्षित करून करावी अशी मागणी देखील निवेदनात केली आहे. याबाबतचे निवेदन महापौर जयवंत सुतार ,स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी ,सभागृह नेते रवींद्र इथापे,राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्ष प्रतोद डॉ.जयाजी नाथ त्यांच बरोबर विविध पक्षाचे गटनेते याना देण्यात आले आहे. मातंग समाजाला येत्या १ ऑगस्ट रोजी आयुक्त, महापौरांकडून जयंती दिनी भेट मिळेल अशी आशा संस्थेचे अभंग शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

काँग्रेसने लोकशाही टिकवली म्हणून चहावाला पंतप्रधान होऊ शकला! : खा. मल्लिकार्जुन खर्गे

Next Post

ब्रिस्टॉलच्या मैदानात ७ गडी राखून भारत विजयी

Next Post
ब्रिस्टॉलच्या मैदानात  ७ गडी राखून भारत विजयी

ब्रिस्टॉलच्या मैदानात ७ गडी राखून भारत विजयी

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

तर मनुस्मृतीला संविधानापेक्षा श्रेष्ठ जाहीर करा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com