• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 27, 2018

31 मे पूर्वीच पाठविला राज्य शासनाला पाणी कृती आराखडाः गणेश देशमुख

adminbyadmin
in पनवेल
0
31 मे पूर्वीच पाठविला राज्य शासनाला पाणी कृती आराखडाः गणेश देशमुख
 कर्मचार्‍यांच्या लवकरच बदल्या
  संघर्ष समितीने सुचविलेल्या कामांना आयुक्तांनी दिले मुहूर्तस्वरूप
पनवेल :-  शहरातील विविध भागात पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍यांकडून होत असलेली दिरंगाई आणि गैरव्यवहाराला आळा घालून कृत्रिम पाणी टंचाई दूर करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील पाणी विभागाच्या कर्मचार्‍यांच्या अंर्तगत बदल्या करण्यात याव्यात, या संघर्ष समितीच्या मागणीला हिरवा कंदील दर्शवत आयुक्त गणेश देशमुख यांनी येत्या आचारसंहिता संपुष्टात येताच, कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येतील, असे आश्‍वासन देवून येत्या दोन ते तीन दिवसात पनवेलसह काळुंद्रे आणि महापालिका क्षेत्रात पाणी वितरण सुरळीत होईल, अशी ग्वाही त्यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
 राज्य शासनाच्या आदेशानुसार 31 मे पर्यंत महापालिकेने पाणी पुरवठ्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर यापूर्वीच संघर्ष समितीच्या सदस्यांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे 31 मे पूर्वीच शासनाला कृती आराखडा पाठविला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
 कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली संघर्षचे सचिव चंद्रकांत शिर्के, मंगल भरवाड, रामाश्री चौहान, दर्शन ठोंबरे, अनुराग वाक्चौरे याशिवाय पटेल नगर सोसायटी आणि काळुंद्रे येथील पाटील महिला मंडळाच्या सदस्यांचा समावेश होता.
 आयुक्तांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा विषयावर छेडले. त्यांनी संघर्ष समितीला दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे पाणी पुरवठा केल्याचे सांगितले. मध्यंतरी काही अंशी अपयश आले असले तरी आता देहरंग धरणात पाणी साठल्याने सुरळीत पुरवठा होईल. तक्रारींचा पूर थांबले, अशी आशा व्यक्त केली.
 डॉ. गिरीश गुणे यांच्या मागणीला गेल्या दीड वर्षापासून दोन्ही आमदार, (शेकाप, भाजपा), गटनेते, विरोधी पक्ष नेते, महापालिका प्रशासनाने दूर्लक्ष केले होते. त्यानुसार कडू यांनी गेल्या चार, पाच दिवसात पाठपुरावा करून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मार्ग परिसरातील स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था करून घेतली. त्याबद्दल देशमुख यांचे कडू यांनी आभार मानले.
 महापालिका क्षेत्रातील सांडपाण्याचा निचरा करणारी गटार व्यवस्था कोलमडून पडली आहे. नाले सफाई व्यवस्थित न झाल्यास पूराचा धोका शहराला उद्भवू शकतो, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. गणेश विर्सजन घाट, सुशोभिकरण, विसर्जनाच्या वेेळेला परिसरात मोठ्या दिव्यांची तात्पुरती व्यवस्था आणि नाट्यगृहात सीसीटिव्ही कॅमेर्‍यांचे नियोजन तसेच नाट्यगृह समितीची निर्मिती आदी महत्वाच्या आणि मुलभूत समस्यांवर जवळपास तासभर चर्चा केली.
 काळुंद्रे गावाला पाणी नाही. पण बाजूच्या सिडको वसाहतींना मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने तेथील महिलांनी आक्रमकपणे मुद्दा रेटून धरला. यावर देशमुख यांनी त्वरीत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.
Previous Post

नाणार प्रकरणी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी सुभाष देसाईंनी राजीनामा द्यावा: खा. अशोक चव्हाण

Next Post

जे मार्केट तोडले, त्याचे डेब्रिज तात्काळ उचला – संदीप खांडगेपाटील

Next Post

जे मार्केट तोडले, त्याचे डेब्रिज तात्काळ उचला - संदीप खांडगेपाटील

ज्यांच्याकडून दंड वसूल केला त्यांचे पैसे परत कराः सचिन सावंत

ज्यांच्याकडून दंड वसूल केला त्यांचे पैसे परत कराः सचिन सावंत

एमजीएम शाळेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना मंगळवारी निदर्शने करणार

मुंबईत शिवसेनेचाच 'आवाssज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com