• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 31, 2018

पालघरमध्ये भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजयः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करेलः खा. अशोक चव्हाण

मुंबई :-पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजय झाला असून भाजपला या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, आज जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालामध्ये देशभरात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. लोकसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळविता आला आहे तर विधानसभेच्या 11 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे. देशभरात समविचारी पक्ष एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात आज दोन ठिकाणी लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. त्यातील भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. त्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार मधुकरराव कुकडे विजयी झाले आहेत. नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारवर जे आरोप करून खासदारकीचा राजीनामा दिला, त्या आरोपांवर एकप्रकारे या निकालातून  शिक्कामोर्तब झाले आहे. हा मोदी सरकारचा मोठा पराभव आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

पालघरचा निकाल काँग्रेस पक्षासाठी धक्कादायक आहे. पालघरमध्ये झालेला पराभव खुल्या दिलाने स्वीकारतो. या निवडणुकीतही समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, असेच आमचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आमच्या सोबतच होती. त्याही पलिकडे जाऊन आम्ही विचार करत होतो. परंतु, काही कारणांमुळे हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला नाही. पण सर्व धर्मनिरपेक्ष समविचारी पक्ष एकत्र आले असते तर आज पालघरचे चित्र वेगळे दिसले असते.

लोकशाही आणि निवडणूक आचारसंहिता व नैतिक मुल्यांना धाब्यावर बसवून भाजपने आपली प्रचार मोहिम राबवली काँग्रेस पक्षाने याबाबत निवडणुक आयोगाकडे तक्रारीही केल्या मात्र दुर्देवाने आयोगाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. शिवसेनेचा ढोंगीपणा आज पुन्हा उघड झाला आहे. भ्रष्टाचारी आणि लाचारी ह्या दोन्ही प्रवृत्ती एकत्र नांदत असतात याचे उदाहरण शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष आहेत. कर्नाटकप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्रातही सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करु असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.   

Previous Post

पालघरवासियांनी विकासाच्या राजकारणाला पसंती दिली – राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

Next Post

जुलमी नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना संघर्ष समितीचे साकडे

Next Post
ओएनजीसीच्या केंद्रीय विद्यालयाने 18 विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची यादी केली घोषित

जुलमी नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना संघर्ष समितीचे साकडे

स्पंदना महिला उद्योगाचे उदघाटन बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न

पामबीच रोडवरील अनधिकृत पार्किंगवर धडक मोहिम

पामबीच रोडवरील अनधिकृत पार्किंगवर धडक मोहिम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com