• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 20, 2018

कर्नाटकात लोकशाहीचा मोठा विजय; देशातील राजकीय चित्र पालटणार!

adminbyadmin
in मुंबई
0
पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नाही!: विखे पाटील
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई, : लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पालटणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.   
कर्नाटकातील घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, कर्नाटकचे विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११६ आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केली. परंतु, राज्यपालांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय न घेता कागदावरसुद्धा बहुमत नसलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेची संधी दिली. भाजपने केवळ १०४ आमदारांची यादी दिली होती. तरीही राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयामुळे घोडेबाजाराला चालना मिळून लोकशाहीचे धिंडवडे निघणार होते. परंतु, सरतेशेवटी भाजपचा घोडेबाजारही यशस्वी झाला नाही आणि येडीयुरप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर आता तेथील राज्यपालांना एक क्षणभरही पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. 
लोकशाही अन् नितिमत्तेच्या गप्पा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा मुखवटा गळून पडला असून, संपूर्ण देशाला त्यांची खरी ओळख झाली आहे. मागील दोन-तीन दिवसांत काँग्रेस आमदारांना लालूच देण्यासंदर्भात समोर आलेले फोन रेकॉर्डिंग्स, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आमदारांवर दबाव आणण्याचे झालेले प्रयत्न पाहता या संपूर्ण घटनाक्रमाचे पडसाद पुढील काळात भारताच्या कानाकोपऱ्यात उमटताना दिसतील, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

 

Previous Post

कविता बोलतील तेच आठवले

Next Post

मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते तुर्भे गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप

Next Post
मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते  तुर्भे गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप

मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते तुर्भे गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप

स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृह बंद

स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेली स्वच्छतागृह बंद

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निरव मोदी व विजय माल्याचे राजकीय अवतारः सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com