• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2018

पाकिस्तानची साखर-विक्री न करण्याचा मनसेचा एपीएमसीतील व्यापार्‍यांना इशारा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अनधिकृत फेरीवाल्यांच्या मोर्च्याला पोलीस परवानगी कशी ? – मनसेचा सवाल

* देशभक्तीचे गोडवे गाणार्‍यांना पाकची साखर कधीपासून गोड लागली- संतप्त गजानन काळेंचा खोचक सवाल
* साखर आयातीवर बहीष्कार टाकून व्यापार्‍यांना देशभक्ती दाखविण्याचे मनसेचे आवाहन
* देशात साखर पडून असताना पाकच्या साखरेचा पुळका कशासाठी – मनसेचा संताप

स्वयंम न्यूज ब्युरो :- ८३६९९२४६४६

नवी मुंबई :- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकीस्तानची साखर दाखल झाल्यानंतरही इतर राजकीय पक्ष व नेतेमंडळी थंडपणा दाखवित असताना गजानन काळेंच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणार्‍या नवी मुंबई मनसेने संताप दाखवित आपल्यातील कडवट देशभक्तीचा प्रत्यय महाराष्ट्राला दाखवून दिला. पाकची साखर खरेदी व विक्री न करण्याचा एपीएमसीतील व्यापार्‍यांना आवाहन करत याप्रकरणी वेळ पडल्यास कायदाही हातात घेण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोदी सरकारने पाकिस्तानातून तब्बल ६० ते ६५ लाख मेट्रिक टन साखर आयात केल्याने शेतकरी व साखर उद्योगासमोरील संकट वाढणार असल्याची भीती निर्माण झाली असून देशभक्तीचे गोडवे गाणार्‍यांना पाकिस्तानची साखर कधीपासून गोड लागू लागली असा खोचक सवाल विचारत पाकिस्तानची साखर विकत घेऊ नये तथा विकू नये अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी एपीएमसी व्यापार्‍यांना दिला आहे. या प्रश्‍नी व्यापार्‍यांनी तरी या साखर आयातीवर बहिष्कार टाकून देशभक्त असल्याची चुणूक दाखवावी असे आवाहन मनसेने एपीएमसी व्यापार्‍यांना केले आहे.
राज्यात यंदाच्या हंगामात जवळपास ६० ते ६५ लाख मेट्रिक टना पेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. त्याशिवाय मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख मेट्रिक टन साखर पडून आहे. या अतिरिक्त साखरेचे करायचे काय या चिंतेत साखर उद्योग असताना पाकिस्तानच्या स्वस्त साखरेने साखर उद्योगाची झोप उडवली आहे. देशभक्तीचा आव आणणार्‍या सरकारला याची जाणीव नाही की काय ? की मागच्या दोन वर्षात तुरडाळीचा घोळ करून या सरकारला या वर्षी साखर उद्योग अडचणीत आणून ऊस उत्पादक शेतकरी याचे कंबरडे मोडायचे आहे का ? असा सवाल मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी विचारला आहे.
पाकिस्तानमधील चिस्तीयन व लालूवल्ली सिंध या ब्रॅण्डची साखर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून या साखरेच्या गोणींवर पाकिस्तान शुगरचा शिक्का आहे. अगोदरच साखरेचे दर खाली आले असून गळीप हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे हे दर आणखीन कोसळतील व ऊस उत्पादक व साखर कारखानदारी मोठ्या संकटात सापडेल अशी भीती मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी व्यक्त केली आहे. भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी सहकाराने व जिल्हा बँका आणि खाजगी सावकारांकडून कर्ज काढून ऊस उत्पादन करतो. पण अशा रीतीने भाजप सरकार पाकिस्तानातून स्वस्त साखर महाराष्ट्रात आयात करून शेतकर्‍यांवर अन्याय करतय व आपले बेगडी देशप्रेम दाखवत असल्याचे मनसेने म्हटले आहे.
कोणत्याही परिस्थितीत मनसे हे होऊ देणार नाही. मोदी-फडणवीसांनी ही साखर घेऊन जाऊन आपल्या घरी चहा प्यावा. मात्र राज्यातील जनता ही साखर घेणार नाही आणि कोणत्याही व्यापार्‍याने ही साखर विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल असा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी दिला आहे. लवकरच एपीएमसीतील सर्व व्यापार्‍यांना याबाबतचे पत्र देणार असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Previous Post

जेएनपीटीतील स्थानिक वाहतुकदारांचा संप मिटला, माजी मंत्री गणेश नाईक यांचा पुढाकार

Next Post

ठाणे -बेलापूर मार्गावरील तयार झालेंले उड्डाणपूल तात्काळ सुरु करा – खासदार राजन विचारे

Next Post
ठाणे -बेलापूर  मार्गावरील तयार झालेंले उड्डाणपूल तात्काळ सुरु करा – खासदार राजन विचारे

ठाणे -बेलापूर मार्गावरील तयार झालेंले उड्डाणपूल तात्काळ सुरु करा – खासदार राजन विचारे

राजस्थान रॉयल्स ने मुंबई इंडियंस चा 7 गडी राखून पराभव केला

राजस्थान रॉयल्स ने मुंबई इंडियंस चा 7 गडी राखून पराभव केला

लोककल्याणकारी योजना तळागाळात राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सक्रिय रहावे – आमदार प्रशांत ठाकूर

लोककल्याणकारी योजना तळागाळात राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत सक्रिय रहावे - आमदार प्रशांत ठाकूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com