• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 3, 2018

सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : खा. अशोक चव्हाण

मोदींना सौदी अरेबियात जाऊन कोकणचा सौदा केला: मोहन प्रकाश

रिफायनरी प्रकल्पात विरोधातील नाणारवासियांच्या आंदोलनाला काँग्रेसची सर्वशक्तीनिशी साथ

 नाणार रत्नागिरी :-  नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील नाणारवासियांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाची सर्वशक्तीनिशी साथ असून सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आज नाणार परिसरातील स्थानिकांशी संवाद साधला व जाहीर सभा घेतली या सभेला संबोधित करताना खा. चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की,  शेतक-यांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इंग्रजकाळांपेक्षा जास्त दंडेलशाही भाजपच्या सत्ताकाळात सुरु आहे. नाणार वरून सेना भाजपचा वरून किर्तन आतून तमाशा सुरु आहे. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई म्हणतात नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली तर मुख्यमंत्री म्हणतात अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही. अधिसूचना रद्द करायला १० मिनिटे लागतात सुभाष देसाई घोषणा करून गेले १० दिवस झाले अद्याप अधिसूचना रद्द झाली नाही. शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकच दलाली खाऊन गुजरातच्या लोकांना जमिनी मिळवून देत आहेत. रिफायनरी प्रकल्प आणून  कोकण उध्दवस्त करण्याचा प्रयत्न करणा-या या सरकारला उध्दवस्त केल्याशिवाय कोकणी माणूस शांत बसणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

या सभेला संबोधित करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच शेतक-यांच्या जमिनी हडप करण्यासाठी पाच वेळा अध्यादेश काढला मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींचा डाव हाणून पाडला. अमेरिकन कंपन्यांच्या फायद्यासाठी मोदींनी नोटाबंदी केली. जपानच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन आणण्याचा घाट घातला आहे. आता सौदी अरेबियात जाऊन मोदींनी कोकणाच्या जमिनीचा सौदा केला असून तुम्ही पुर्वजांनी जपलेला ह्या निसर्गसंपन्न भूमीच्या रक्षणासाठीचा लढा तीव्र करा काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे असा विश्वास त्यांनी नाणारवासियांना दिला.

नाणार रिफायनरी विरोधी कृती समितीचे अशोक वालम यांनी प्रकल्पाला ९५ टक्के लोकांचा विरोध असल्याचे सांगितले तसेच नाणार वासियांच्या लढ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यधांचे जाहीर आभार मानले.

या सभेला मार्गदर्शन करताना खा. हुसेन दलवाई, आ. हुस्नबानो खलिफे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी नाणार प्रकल्पावरून भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली.

Previous Post

आयसीसी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण – पाच वर्षांनी इंग्लंड अव्वल

Next Post

आमदार संदीप नाईकांनी आता कार्यक्षेत्र विस्तारावेच…

Next Post
वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

आमदार संदीप नाईकांनी आता कार्यक्षेत्र विस्तारावेच...

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली नेरुळ, वाशी, कोपरखैरणे विभागातील सुविधा कामांची पाहणी

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केली नेरुळ, वाशी, कोपरखैरणे विभागातील सुविधा कामांची पाहणी

कामगार दिनाचे औचित्यसाधून सर्व कंत्राटी साफसफाई कामगारांचा सन्मान

कामगार दिनाचे औचित्यसाधून सर्व कंत्राटी साफसफाई कामगारांचा सन्मान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com