• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2018

स्मशानभूमी नसल्याने रबाले झोपडपट्टीधारकांची मरणानंतरही ससेहोलपट कायम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
स्मशानभूमी नसल्याने रबाले झोपडपट्टीधारकांची मरणानंतरही ससेहोलपट कायम

दीपक देशमुख
नवी मुंबई : मानवाचे अंतिम ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. परंतु रबाले झोपडपट्टी परिसरात नवी मुंबई महापालिका स्थापन झाल्यापासून महापालिका प्रशासनाला व सत्ताधार्‍यांना येथे आजतागायत स्मशानभूमी निर्माण करता आली नाही. यामुळे येथील नागरिकांना अंतिम संस्कार रबाले गावातील स्मशान भूमीत करावे लागत आहे. रबाले गावात जाताना अनेक रस्ते ओलांडून जावे लागत असल्याने नातेवाईकांची अक्षरशः दमछाक होत आसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे देशातील २१व्या शतकातील आधुनिक शहर समजले जाणार्‍या हे शोभते का असा सवाल आर पी आय आठवले गटाचे नवी मुंबई युवक उप अध्यक्ष भरत भालेराव यांनी विचारला आहे.
दरम्यान येथील नागरिकांनी साईबाबा नगरच्या पायथ्याशी अनधिकृत स्मशानभूमी तयार केली होती .परंतु आता तिथे एमआयडीसीची इमारत झाल्याने येथील नागरिकांना रबाले गावातील स्मशानभूमी शिवाय पर्याय उरला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
रबाले झोपडपट्टीत सध्या २०११च्या जनगणनेनुसार २० हजार नागरिक वास्तव्यास आहेत. या ठिकाणी रोज एक तरी नागरिक मृत होत आहे. परंतु या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील नागरिकांना एक किलोमिटर अंतर पार करून रबाले गावातील मनपाच्या स्मशानभूमीत यावे लागते. या स्मशानभूमीत येताना पहिले ठाणे बेलापूर महामार्ग पार करून ऐरोलीच्या दिशेने आल्यानंतर ऐरोली,मुलुंड महामार्ग पार करावे लागत आहे. यामुळे नागरिकांना व नातेवाईकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आर पी आय आठवले गटाचे उपाध्यक्ष भालेराव यांनी सांगितले.
रबाले गावात जाताना होणार्‍या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून येथील नागरिकांनी साईबाबा नगर, महापे, ठाणे महामार्गालगत एक छोटेखानी स्मशानभूमी निर्माण केली होती. त्यावर काही नागरिक अंत्यसंस्कार करत असत. परंतु तोच भूखंड एमआयडीसी प्रशासनाने एका खाजगी कारखान्याला दिल्यामुळे संबंधित मालकांनी तिथे इमारत बांधल्यामुळे येथील नागरिकांना आता पुन्हा एकवार रबालेगावतील स्मशानभूमी शिवाय पर्याय नसल्याचे येथील नागरिक प्रकाश गमरे यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने विविध नागरी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असताना रबाले झोपडपट्टी परिसरात मानवाचा अंतिम ठिकाण निर्माण करू शकत नाही. गेल्या अनेक वर्षात अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मनपाला हे शोभत नसल्याचे मत आरपीआय आठवले गटाचे युवक उपाध्यक्ष भालेराव यांनी व्यक्त केले आहे.
रबाले गाव परिसरात जायचे म्हणजे अनेक रस्ते पार करून जावे लागते .त्यामुले कधी कधी अपघाताच्या घटना घडत आहेत. जर अपघात होऊन एखाद्या नागरिकांचा मृत्यू ओढवला तर जबाबदारी कोणाची याचाही विचार मनपा प्रशासनाने करावी असेही भरत भालेराव यांनी सांगितले.
या बाबत मालमत्ता उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांना विचारले असता,एक भूखंड उपलब्ध असून त्या भूखंडाविषयी न्यायालयात दावा चालू आहे,त्यामुळे अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे येथील रहीवाशांची मरणानंतरही अत्यंविधीकरिता आजही परवडच सुरू असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

३१५०० वर सोन्याचा भाव जावूनही अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा उत्साह कायम

Next Post

पनवेल महापालिका भाजपाच्या प्रवक्तापदी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची नियुक्ती

Next Post
पनवेल महापालिका भाजपाच्या प्रवक्तापदी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची नियुक्ती

पनवेल महापालिका भाजपाच्या प्रवक्तापदी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची नियुक्ती

दिघा रेल्वे स्टेशन नियोजित जागेतच उभारा – माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

दिघा रेल्वे स्टेशन नियोजित जागेतच उभारा - माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

‘महाराष्ट्र भवन’च्या मागणीकरिता मनसेच्या घोषणांनी सिडको परिसर दणाणला

‘महाराष्ट्र भवन’च्या मागणीकरिता मनसेच्या घोषणांनी सिडको परिसर दणाणला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com