• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 15, 2018

नाणार रिफायनरी प्रश्नी काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबतः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
नाणार रिफायनरी प्रश्नी काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबतः खा. अशोक चव्हाण

काँग्रेस शिष्टमंडळ नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधणार

मुंबई :-  नाणार रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकारने प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबत असून काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ १९ एप्रिल पासून नाणार आणि परिसराचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधणार असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

आज अशोक दादा वालम यांच्या नेतृत्वाखालील कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबत असल्याचे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी संपादीत केल्या जाणा-या जमिनीवर आंबा आणि काजूची लाखो झाडे आहेत. या प्रकल्पामुळे या भागातील शेतक-यांची सुपीक जमीन जाणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे होणा-या प्रदूषणामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होणार आहे अशी भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष असून सरकारने त्याची दखल घ्यावी. स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करू नये. स्थानिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेऊनच सरकारने पुढची पावले टाकावीत असे खा. चव्हाण म्हणाले.

नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असेल तर प्रकल्पाच्या जमीन संपादनासाठी एमआयडीसीने काढलेले परिपत्रक रद्द करावे अन्यथा सरकारमधून बाहेर पडावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.  

Previous Post

इंदू मिल येथे स्मारकाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री

Next Post

राजकारणापुढे नात्याचा ओलावा ‘फिका’ पडल्याचा गोपीनाथ मुंडे समर्थकांचा संताप

Next Post
राजकारणापुढे नात्याचा ओलावा ‘फिका’ पडल्याचा गोपीनाथ मुंडे समर्थकांचा संताप

राजकारणापुढे नात्याचा ओलावा ‘फिका’ पडल्याचा गोपीनाथ मुंडे समर्थकांचा संताप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

वीस ते पंचवीस मिनिटात दिघा ते बेलापुर तुम्हीच सांगा कसे होणार पार ?

वीस ते पंचवीस मिनिटात दिघा ते बेलापुर तुम्हीच सांगा कसे होणार पार ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com