• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2018

साडेबारा टक्के योजनेचे निवेदन उचित कार्यवाहीसाठी सिडकोकडे पाठविले

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी
आमदार संदीप नाईक यांच्या तारांकीत प्रश्‍नाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे लेखी उत्तर
मुंबई :-  नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी शासन राबवित असलेली साडेबारा टक्के योजना बंद करु नये, या विषयी आमदार संदीप नाईक यांनी शासनाकडे मागणी केली होती. या संदर्भात  प्राप्त निवेदन सिडको महामंडळाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली आहे.
नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने सिडकोच्या माध्यमातून स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्या. त्या मोबदल्यात त्यांच्यासाठी साडेबारा टक्के  भूखंडाची योजना सुरु केली. मात्र अनेक प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप बाकी असताना अचानक ऑगस्ट २०१७ मध्ये ही योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोच्या संचालक मंडळाने घेतला. यावर आक्षेप घेत जोपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के  योजनेचे वाटप होत नाही तोपयर्ंत ही योजना सुरुच ठेवावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी ११ ऑगस्ट २०१७ रोजी शासनाकडे केली होती. प्रकल्पग्रस्तांनी गावठाणात गरजेपोटी बांधकामे केली आहेत.  त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. ही बाब शासनाच्या विचाराधीन असताना साडेबारा टक्क्यांची योजना अचानक बंद करणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्यासारखे होईल, असे आमदार नाईक यांनी तारांकीत प्रश्‍नात म्हटले होते.  २२ सप्टेंबर २०१७ रोजी सिडको महामंडळाने वृत्तपत्रांमधून जाहिरात प्रसिध्द करुन  या तारखे पुढील ६० दिवसांत साडेबारा टक्के योजना बंद करण्यात येणार असल्याबाबत प्रकल्पग्रस्तांना कळविले  होते.  या मुदतीत प्राप्त झालेल्या साडेबारा टक्क्यांच्या अर्जांवर  सिडकोकडून कार्यवाही करण्यात येणार असून शेवटच्या भूधारकास साडेबारा टक्के योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तथापी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संबंधी दिलेले निवेदन उचित कार्यवाहीसाठी सिडको महामंडळाकडे पाठविण्यात आले आहे, असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.
राबवित असलेली साडेबारा टक्के योजना बंद करु नये, या विषयी आमदार संदीप नाईक यांनी शासनाकडे मागणी केली होती. या संदर्भात  प्राप्त निवेदन सिडको महामंडळाकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली आहे.
नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने सिडकोच्या माध्यमातून स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्या. त्या मोबदल्यात त्यांच्यासाठी साडेबारा टक्के  भूखंडाची योजना सुरु केली. मात्र अनेक प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप बाकी असताना अचानक ऑगस्ट २०१७ मध्ये ही योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोच्या संचालक मंडळाने घेतला. यावर आक्षेप घेत जोपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के  योजनेचे वाटप होत नाही तोपयर्ंत ही योजना सुरुच ठेवावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी ११ ऑगस्ट २०१७ रोजी शासनाकडे केली होती. प्रकल्पग्रस्तांनी गावठाणात गरजेपोटी बांधकामे केली आहेत.  त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. ही बाब शासनाच्या विचाराधीन असताना साडेबारा टक्क्यांची योजना अचानक बंद करणे म्हणजे या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्यासारखे होईल, असे आमदार नाईक यांनी तारांकीत प्रश्‍नात म्हटले होते.  २२ सप्टेंबर २०१७ रोजी सिडको महामंडळाने वृत्तपत्रांमधून जाहिरात प्रसिध्द करुन  या तारखे पुढील ६० दिवसांत साडेबारा टक्के योजना बंद करण्यात येणार असल्याबाबत प्रकल्पग्रस्तांना कळविले  होते.  या मुदतीत प्राप्त झालेल्या साडेबारा टक्क्यांच्या अर्जांवर  सिडकोकडून कार्यवाही करण्यात येणार असून शेवटच्या भूधारकास साडेबारा टक्के योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तथापी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संबंधी दिलेले निवेदन उचित कार्यवाहीसाठी सिडको महामंडळाकडे पाठविण्यात आले आहे, असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे. 
Attachments area
Click here to Reply, Reply to all, or Forward
7.85 GB (52%) of 15 GB used
Manage
Terms – Privacy
Last account activity: 15 minutes ago

Details

Previous Post

दिव्यांगांकरिता उद्यानात खेळणी उपलब्ध करून देण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

Next Post

धुरफवारणीत गैरव्यवहार होत असल्याचा मनसेच्या रूपेश कदमांचा आरोप

Next Post
धुरफवारणीत गैरव्यवहार होत असल्याचा मनसेच्या रूपेश कदमांचा आरोप

धुरफवारणीत गैरव्यवहार होत असल्याचा मनसेच्या रूपेश कदमांचा आरोप

प्लास्टिक / थर्माकोलपासून बनविल्या जाणा-या वस्तुंच्या  उत्पादन, वापर, साठवणुक, वितरण, विक्री बाबत जाहीर आवाहन

प्लास्टिक / थर्माकोलपासून बनविल्या जाणा-या वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणुक, वितरण, विक्री बाबत जाहीर आवाहन

पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नाही!: विखे पाटील

... तर उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार!: विखे पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com