• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 15, 2018

‘गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करावे – मुख्यमंत्री

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मुंढेंना आयुक्तपदी कायम ठेवल्याने मनसेकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई, दि. 15 : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठं परिवर्तन करणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यामुळे धरणे,तलाव, तळी पुनरुज्जीवित होऊन शेत जमीन सुपीक होत आहे. यंदा पुढील तीन ते चार महिने दुष्काळी जिल्ह्यातील कामांवर लक्ष केंद्रीत करावे, जेणेकरून पावसाळ्यात या जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ होवून शेत जमिनींनाही मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मृद व जलसंधारण विभागाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वयंसेवी संस्था, विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रतिनिधी यांच्याबरोबर संवाद साधून या योजनेसंबंधी चर्चा केली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, बेन कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा टाटा ट्रस्टचे सदस्य अमित चंद्रा, आशिष देशपांडे, अनुलोमचे अतुल वझे व स्वानंद ओक, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, केरिंग फ्रेंडसचे निमेश शहा यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रबोधनासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रफितीचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविल्यानंतर जुनी धरणे, तलावांमधील गाळ काढून ती पुनरुज्जीवीत करण्याच्या हेतूने हे अभियान राबविण्यात आले. यातून पाणीसाठा वाढण्याबरोबरच शेत जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत होईल. गेल्यावर्षी या योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला असून पुढील दोन ते तीन वर्षात राज्यातील 70 ते 80 टक्के धरणे ही गाळमुक्त होणार आहेत. या माध्यमातून चांगले काम चालले असून राज्य शासन या मागे खंबीरपणे उभे राहिल. राज्य शासन, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग व विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या मोहिमेला उत्सवाचे रूप देऊया.

या योजनेची कामे करताना त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी. झालेल्या प्रत्येक कामांचे बिग डाटा अॅनालिटिक्स प्रणालीप्रमाणे, डॉक्युमेंटेशन व मॅपिंग करावे. या कामासाठी संसाधनांचा आणि सामुग्रीचाही प्रभावी वापर करण्यात यावा. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच लोकसहभागासह विविध घटकांना जोडून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

श्री. चंद्रा म्हणाले, तीन वर्षापूर्वी दुष्काळाची दाहकता पाहून या क्षेत्रात काम करायचे टाटा ट्रस्टने ठरविले. दुष्काळ कमी करण्यासाठी इतर उपाययोजनेबरोबरच या समस्येच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आणि धरणे, पाणीसाठ्याच्या ठिकाणचा गाळ काढण्याच्या कामास सुरूवात केली. सुरुवातीला एका गावातील तलावाचा गाळ काढल्यानंतर त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यानंतर बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले. या कामात स्वयंसेवी संस्था व कंपन्यांबरोबरच शासनाचा सहभाग असला तर त्याची व्याप्ती वाढेल हे हेरून राज्य शासनाबरोबर काम करण्याचे निश्चित केले. राज्य शासनाच्या मोलाच्या सहकार्यामुळे गाळमुक्त धरण उपक्रमाचा चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुपिकता वाढण्याबरोबरच धरण, तलावाच्या परिसरातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. राज्य शासनाने दुष्काळ दूर करण्यासाठी या योजनेची व्याप्ती वाढवावी.

श्री. शांतीलाल मुथा व अनुलोम संस्थेचे स्वानंद ओक यांनीही कामाचे अनुभव सांगितले. श्री. मुथा यांनी सांगितले, यावर्षी नुकत्याच बुलढाणा जिल्ह्यात सुरू केलेल्या या योजनेच्या कामाला आठ दिवसात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून रोज किमान दोनशे एकर शेतजमीन सुपिक होईल एवढा गाळ निघत आहे. एकवर्षात चार कोटी क्युबिक मीटर गाळ काढण्यात येईल.

सचिव श्री. डवले यांनी यावेळी गेल्या वर्षी झालेल्या कामांचे सादरीकरण केले.

Previous Post

सी.बी.डी. येथील हॉटेल कृष्ण अवतार येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा

Next Post

बेलापूर गावातून समूह विकास योजनेला सुरुवात

Next Post
आमदार मंदाताईं म्हात्रेंच्या प्रयत्नामुळे नवी मुंबई आता राहणार सीसीटीव्हीच्या नजरकैदेत

बेलापूर गावातून समूह विकास योजनेला सुरुवात

गुढी पाडव्याला सभेच्या वेळी वीज पुरवठा खंडित केल्यास खबरदार – मनसेची विद्युत विभागाला तंबी

गुढी पाडव्याला सभेच्या वेळी वीज पुरवठा खंडित केल्यास खबरदार - मनसेची विद्युत विभागाला तंबी

विविध नागरी सुविधा कामांचा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन, यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा

विविध नागरी सुविधा कामांचा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन, यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com