• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2018

अर्थमंत्र्यांच्या कवितांना विखे पाटील यांचेही चोख काव्यात्मक प्रत्युत्तर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नाही!: विखे पाटील

सरकारच्या दाव्यांचा विरोधी पक्षनेत्यांनी केला पंचनामा

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले.

विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये अर्थमंत्र्यांच्या अनेक कवितांचा कवितांमधूनच समाचार घेतला. यंदाच्या अर्थसंकल्पाला हजारो शेतकरी आत्महत्या, वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या, हजारो कुपोषित बालकांचे मृत्यू,कमला मील अग्नितांडवातील 14 निरपराधांचे बळी, अशी पार्श्वभूमी होती. तरीही अर्थमंत्र्यांना कविता सूचत होत्या, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. आचार्य अत्रेंच्या ओळींमध्ये थोडा बदल करून त्यांनी अर्थमंत्र्यांना सुनावले की,

“मुले पुरताना चिता पेटताना,

सूचती मनी कविता किती नाना”

 यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे मुशायरा किंवा कवी संमेलन भासत होते. अर्थमंत्री एक चांगले कलाकार आहेत. त्यांच्या कविता वाचनासाठी एखादे विशेष अधिवेशन बोलावायला हरकत नाही, अशा मार्मिक शब्दांत विखे पाटील यांनी अर्थमंत्र्यांना चिमटे काढले. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात कवी कालिदासांचा उल्लेख केला. परंतु, त्यांचा आवेश असा होता की, कवी कालिदासानंतरजणू आपले सुधीरदासच; आणि कालिदासांच्या मेघदूतानंतर सुधीरदासांचा अर्थसंकल्पच, अशी परिस्थिती असल्याचे विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले.

 सरकारने तीन वर्षे केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला. परंतु, आता जनतेला वस्तुस्थिती उमगल्याने सरकारला आपली बाजू सावरण्यासाठी कविता,  शेरोशायरीचा  आधार घ्यावा लागत असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक कविता सांगत सरकारच्या नियोजनशून्य लोकविरोधी कारभाराचे वाभाडे काढले.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या प्रारंभी सरकारचे संकल्प व्यक्त करताना सांगितले होते,

“परिवर्तन का ज्वार लाये है,

सबका साथ, सबका विकास लिये

महाराष्ट्र को उभार रहे है”.

त्यावर विखे पाटील यांनी अर्थमंत्र्यांच्या कवितेत बदल करत महाराष्ट्राची वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवीन ओळी सुनावल्या.

“आत्महत्याओं का ज्वार लाये है,

जनता का घात, मंत्रियो का विकास किये

ये तो महाराष्ट्र को डुबा रहे है”

 

भाजप-शिवसेनेचे सरकार शेतकरी हिताचा असल्याचा दावा करताना मुनगंटीवार म्हणाले होते,

“शेतकरी हा कणा आमुचा, हित तयाचे पाहू

अडी-अडचणी कितीही येवो, सोबत त्यांच्या राहू,

विहीरी देऊ, सिंचन देऊ, देऊ शेततळे

वचन आमचे प्राणपणाने हे नाते आम्ही निभाऊ”

परंतु, प्रत्यक्षात या सरकारची शेतकऱ्यांबाबतची अनास्था वारंवार दिसून आल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,

“विहीरी सांगा, सिंचन सांगा, सांगा शेततळे,

बोलाचीच कढी तुमची, उधळा मुक्ताफळे,

कर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,

बळीराजा हा तयार आता, मोडाया तुमचा कणा”

 

अर्थसंकल्पीय भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना कमालीची यशस्वी ठरल्याचे सांगितले होते. त्याविषयी ते म्हणाले होते की,

“नसो कुणाच्या चेहऱ्यावरती दु:खाचा अंधार,

अन् तारुण्याच्या खांद्यावरती बेकारीचा भार,

कौशल्याचा विकास देऊ रोजगाराची हमी,

मिळेल साऱ्यांच्या स्वप्नांना हक्कांचा आधार”

परंतु, विरोधी पक्षनेत्यांनी ही योजना संपूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप केला. कौशल्य विकास, रोजगाराची स्थिती इतकी वाईट आहे की, राज्यातील प्रत्येक तरुण सरकारला शिव्याशाप देत असल्याचे त्यांनी कवितेतच सांगितले.

“कौशल्याचा विकास नाही,

ना रोजगाराचा पत्ता,

तरुणांना का मूर्ख समजता?

झोडता भाषण, उठता बसता”.

 

अर्थमंत्र्यांना ना अर्थसंकल्पाची आकडेवारी जुळवता आली, ना भुलथापा-फसव्या घोषणा व राज्याची वस्तुस्थिती जुळवता आली, ना किमान कवितांची यमके जुळवता आली. यमके जुळत नव्हती तर सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे होते, अशी सूचना विखे पाटील यांनी मांडताच विधानसभेत हंशा पिकला व अनेक आमदारांनी बाकेही वाजवली. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवरही ओळी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते,

“होळकरांचा मानबिंदू तिने गाजविले भू-लोक,

आदराने आम्ही म्हणतो, सारे तिला पुण्यश्लोक”

त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हे सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव घेते. पण त्यांचे विचार अंमलात आणत नाही. या सरकारला पुण्यश्लोक अहिल्यादेवींबाबत खरोखर आदर असेल तर याच अधिवेशनात धनगरांना आरक्षण देण्याची घोषणा झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

 आपल्या भाषणाचा शेवट करतानाही विखे पाटील अर्थमंत्र्यांच्याच कवितेला उत्तर दिले. मुनगंटीवारांनी आपल्या भाषणात सांगितले होते की,

“खुब करो साहिब कोशिश

हमे मिट्टी मे दबाने की,

शायद आपको नही मालूम की हम बीज है,

आदत है हमारी बार बार उग जाने की,

हर बार चुनाव जितने की”

या ओळींमधून सरकारच्या सर्व घोषणा निवडणूक केंद्रीत असतात, ‘चुनावी जुमलेच’ असतात, हे स्पष्ट होते. स्वतः अर्थमंत्र्यांनीच आपल्या भाषणात याची कबुली दिली आहे, असे सांगून विखे पाटील पुढे म्हणाले की,

“हमे पता है

आप बीज नही, बल्की ‘नाचीज’ है

आदत है आपकी,

चुनाव सामने रखकर भाषण-घोषणाऍ करने की,

लेकीन अब ये जनता मूर्ख नही, ना ही भोली..

आपके ‘चुनावी जुमले अब खूब समझती है

2019 में आपको मिटाकर, देखना हमेही जिताती है”

Previous Post

सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या हाती ‘लेखी जुमला’च दिलाः खा. अशोक चव्हाण

Next Post

सर्वसमावेशक समुह विकास योजनेच्या सुधारित अधिसूचनेसाठी लवकरच बैठक

Next Post
वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

सर्वसमावेशक समुह विकास योजनेच्या सुधारित अधिसूचनेसाठी लवकरच बैठक

आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी तहसीलदारांना ७२ तासांची मुदत

आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी तहसीलदारांना ७२ तासांची मुदत

सी.बी.डी. येथील हॉटेल कृष्ण अवतार येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा

सी.बी.डी. येथील हॉटेल कृष्ण अवतार येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com