• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 1, 2018

अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊसः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

सर्वसामान्यांवर कराचा बोजा टाकून महागाई वाढवणारा निराशाजनक अर्थसंकल्प

 मुंबई : अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कोणताही रोडमॅप नाही. मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले असून सर्वसामान्यांवर कराचा बोजा टाकून महागाई वाढवणारा व जनतेची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना खा. चव्हाण म्हणाले की, शेती मालाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा ही निव्वळ धुळफेक असून सरकारने उत्पादन खर्चच FCI व कृषी मुल्य आयोगाच्या किंमतीपेक्षा दिडपट कमी धरला आहे. शेतक-यांचे उत्पन्न 2020 पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा सरकारकडून वारंवार केली जाते आहे पण अमंलबजावणीचा ठोस कृती आराखडा जाहीर केला जात नाही. टॅक्स स्लॅब मध्ये बदल करून सरकार दिलासा देईल अशी मध्यमवर्गीय व  नोकरदारांची अपेक्षा होती पण सरकारने त्यांची घोर निराशा केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस जीएसटीच्या कक्षेत आणून सरकार इंधनाच्या किंमती कमी करेल अशी अपेक्षा होती पण सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवून सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत ढकलण्याचे काम केले आहे. कॉर्पोरेट टॅक्स कमी करून सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही तर कॉर्पोरेट्सच्या हितासाठी काम करित आहे हे दाखवून दिले आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

डिजीटल इंडियाच्या गप्पा मारणा-या सरकारने मोबाईल, लॅपटॉपवरील ड्युटी वाढवल्याने ते महागणार आहेत. सेस 3 टक्क्यावरून वाढवून 4 टक्के केला आहे. त्यामुळे प्रत्येक बिलावर कर वाढणार आहे. सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अर्थमंत्र्यांनी  अर्थसंकल्पात निवडणूकीच्या प्रचारसभेप्रमाणे फक्त घोषणा आणि आश्वासने दिली आहे प्रत्यक्षात दिलासा मात्र दिला नाही. पुन्हा एकदा गोड स्वप्ने दाखवून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम या सरकारने केले आहे. या अर्थसंकल्पातून देशातील जनतेच्या हाती प्रत्यक्षात काहीच पडणार नाही. सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करत असतानाच  राजस्थानमधील दोन लोकसभा व एका विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीचे निकाल आले आणि जनतेने भाजपचा पराभव करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी केले. भाजप सरकारच्या पोकळ घोषणांवर आणि फसव्या आश्वासनांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसून हा भाजप सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post

खारघर व शिरढोण येथे गुटखा विक्रीच्या गोदामावर छापे

Next Post

वाशी सेक्टर-9 ए येथील फळ-भाजी मंडईचा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा पाहणी दौरा

Next Post
वाशी सेक्टर-9 ए येथील फळ-भाजी मंडईचा  आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा पाहणी दौरा

वाशी सेक्टर-9 ए येथील फळ-भाजी मंडईचा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा पाहणी दौरा

गावातील अस्वच्छता, बकालपणाने महापौर जयवंत सुतार संतप्त

गावातील अस्वच्छता, बकालपणाने महापौर जयवंत सुतार संतप्त

नेरूळ सेक्टर दोनमध्ये स्वच्छता सर्वेक्षण राबविले जात नसल्याचा भाजपचा आरोप

नेरूळ सेक्टर दोनमध्ये स्वच्छता सर्वेक्षण राबविले जात नसल्याचा भाजपचा आरोप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com