• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 24, 2017

निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र- उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू

adminbyadmin
in मुंबई
0
निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र- उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू

मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण

            मुंबई : निरोगी राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र बनू  शकते हे लक्षात घेतले तर मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

“द योगा इन्स्टिट्युट”, मुंबई या  संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभात ते बोलत होते.  यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, संस्थेच्या संचालिका  हंसा जयदेव,योग क्षेत्रातील मान्यवर पद्मश्री नागेंद्र, पद्मश्री ङॉ. डी. आर कार्तिकेय, बसावा रेड्डी, स्वामी चिदानंद सरस्वती, आचार्य लोकेश मुनी, सुबोध तिवारी, ऋषी जयदेव योगींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

काम, ज्ञान आणि समर्पण या तीन गोष्टींचा समन्वय झाला तर हाती घेतलेले काम अधिक उत्कृष्टपणे पूर्णत्वाला जाऊ शकते. योग संस्थेने या तीन गोष्टींचा आपल्या कार्यात अंतर्भाव केल्याने ही संस्था  केवळ एक संस्था न राहाता ती एक जीवनशाळा झाली आहे. संस्थेने  भारतीय प्राचीन विज्ञानाचा भाग असणारे योग शिक्षण घराघरात पोहोचवले आहे,  असे गौरोवोद्गार श्री. नायडू यांनी यावेळी काढले. ते पुढे म्हणाले की, संस्थेचे  योग प्रशिक्षण आणि प्रचाराचे कार्य अलौकीक आहे. जागतिकस्तरावर काम करणारी ही एक महत्वपूर्ण संस्था असल्याचेही ते म्हणाले.

योग हा जीवनाचा समग्र दृष्टीकोन असल्याचे सांगून श्री. नायडू पुढे म्हणाले की,  योग शिक्षण केवळ शरीर निरोगी ठेवते असं नाही तर मनाला निरोगी ठेवण्याचं काम ही नियमित योगातूनच होते. शारीरिक, अध्यात्मिक आणि भावनिक संतुलनाबरोबर कृतिशील समाज निर्मितीमध्ये योग महत्वाचा ठरतो. कामामधील एकाग्रता वाढवण्यास योग उपयुक्त ठरतो. बदलल्या जीवनशैलीमुळे हालचालींवर मर्यादा आली आहे, वाढत्या स्पर्धेमुळे भावनिक असंतुलन निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शांत आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग योगाच्या माध्यमातूनच मिळू शकतो.  

तरूण पिढीने जन्मदात्री, जन्मभूमी, मातृभाषा, देश आणि गुरु या पाच गोष्टींना आपल्या आयुष्यात विशेष महत्व द्यावे, त्याचा कधीही विसर पडू देऊ नये असे सांगून त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ पासून २१ जून हा दिवस “जागतिक योग दिवस” म्हणून साजरा होत असल्याचा आवर्जुन उल्लेख केला.

कार्यक्रमात इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली त्याचबरोबर संस्थेची माहिती सांगणारी एक ध्वनी चित्रफीतही यावेळी दाखवण्यात आली. संस्थेच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

 

Previous Post

एसएससी सराव परिक्षेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

झोपडपट्टी पुनर्विकास व पात्र झोपडपट्टी वासियांचे फोटोपास त्वरित वाटप करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

Next Post
झोपडपट्टी पुनर्विकास व पात्र झोपडपट्टी वासियांचे फोटोपास त्वरित वाटप करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

झोपडपट्टी पुनर्विकास व पात्र झोपडपट्टी वासियांचे फोटोपास त्वरित वाटप करण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

गर्भवती महिलेचा खून पतीनेच केला

गर्भवती महिलेचा खून पतीनेच केला

नेरूळ सेक्टर आठमधील धनवर्षा पतसंस्थेमध्ये घरफोडीची घटना, ५३ हजार ९०० रूपयांची चोरी

नेरूळ सेक्टर आठमधील धनवर्षा पतसंस्थेमध्ये घरफोडीची घटना, ५३ हजार ९०० रूपयांची चोरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com