• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 23, 2017

दोन अधिकार्‍यांना निलंबित करून पालिका आयुक्तांचा भूमाफियांना इशारा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिकेने अर्धवट अवस्थेत कारवाई करून सोडून दिलेल्या बेकायदा इमारतींच्या झालेल्या पुनर्बांधणीप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी घणसोली विभागाचे अधीक्षक चंद्रकांत बंडगर आणि कनिष्ठ अभियंता महेश बाविस्कर या दोन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत शहरात बेकायदा बांधकामांना थारा देणार नाही, असा संदेश आयुक्तांनी यातून दिला असल्याने नवी मुंबईतील भूमाफियांचेही धाबे दणाणले आहे. बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांचीही गय केली जाणार नाही, असा इशाराच यातून आयुक्तांनी दिला आहे.
२०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदा बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करून भूमाफियांना सळो की पळो’ करून सोडले होते. तुकाराम मुंढे यांची पुण्याला राज्य सरकारने बदली केल्यानंतर मात्र, नंतरच्या काळात अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई धीम्या गतीने सुरू झाल्याने भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली होती.
प्रशासनाचा वचक कमी झाल्याने कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, ऐरोली, शहाबाज या गावांतील अर्धवट पाडलेल्या बेकायदा इमारतींची पुनर्बांधणी करण्यास भूमाफियांनी सुरुवात केली होती. त्याची दखल घेत रामास्वामी यांनी अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. शहरात एकीकडे कारवाई सुरू असताना आधी केलेल्या कारवाईबाबत उदासीनता का, असा जाब त्यांनी पालिका अधिकार्‍यांना विचारला.
घणसोली, गोठीवलीसह इतर इमारतींवर केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर या प्रकरणी घणसोली विभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता व अधीक्षक यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित केले.
नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी ज्या स्थानिक ग्रामस्थांनी, प्रकल्पग्रस्तांनी योगदान दिले, त्यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना अतिक्रमण घोषित करण्यात येत आहे, भूमीपुत्रांची घरे नियमित होत नाही. गावठाणामध्ये बांधलेल्या घरांना, इमारतींना पाणीपुरवठा पालिका प्रशासन करत नसले तरी अनधिकृतपणे बांधलेल्या चाळींच्या परिसरात पाणी, शौचालय यासह अन्य नागरी सुविधा पालिका प्रशासन उपलब्ध करून देत आहे, ही या शहरासाठी आणि येथील स्थानिक ग्रामस्थांसाठी मोठी शोकांतिका आहे.

Previous Post

भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

Next Post

वाढीची भाजी आता ओळखणे झाले अवघड

Next Post
गटाराच्या, नाल्याच्या सांडपाण्यावर पिकणारी वाढीची भाजी आलीय मार्केटमध्ये विक्रीला

वाढीची भाजी आता ओळखणे झाले अवघड

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील छायाचित्रकारांसाठी “प्रतिमा – नवी मुंबईची, छायाचित्रण स्पर्धा”

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील छायाचित्रकारांसाठी "प्रतिमा - नवी मुंबईची, छायाचित्रण स्पर्धा"

कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

विविध उत्सव, धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळाच्या पदाधिका-यांची 28 नोव्हेंबरला विशेष बैठक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com