• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2017

एल्फिन्स्टन स्टेशनवरील दुर्घटनेला सरकार जबाबदारः खा. अशोक चव्हाण.

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एल्फिन्स्टन स्टेशनवरील दुर्घटनेला सरकार जबाबदारः  खा. अशोक चव्हाण.

‘केईएम हॉस्पिटलला’ भेट देऊन केली जखमींची विचारपूस.

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनवर घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी असून या घटनेला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

तत्पुर्वी खा.अशोक चव्हाण यांनी आज परळ येथील केईएम हॉस्पिटला भेट देऊन एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकावर घडलेल्या दुर्देवी घटनेतील जखमींची विचारपूस केली व हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी जखमींच्या उपचाराबाबत चौकशी केली. यावेळी मृत्यू पावलेल्या प्रवाशांना श्रध्दांजली अर्पण करून खा. चव्हाण म्हणाले की आज सकाळी एलफिन्स्टन-परळ स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा मृत्यू झाला याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असून या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कडक करावाई करावी.

पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन स्टेशन आणि मध्य रेल्वेवरील परेल स्टेशनला जोडणारा हा पुल अरुंद आहे. या स्टेशनवरून ये-जा करणा-या प्रवाशांची संख्या फार मोठी असल्यामुळे कायम गर्दी होते. स्थानिक नागरिक व रेल्वेप्रवाशांनी वारंवार या मार्गावर नवीन पुलाची मागणी करुन देखील रेल्वेप्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. मुंबईत दररोज 10 लोक रेल्वे अपघातात आपला जीव गमावतात.

रेल्वेमंत्री पियुष गोयल हे मुंबईकर आहेत. गोयल 70 लाख मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा फक्त साडेसातशे प्रवाशी वाहतूकीची क्षमता असलेल्या बुलेट ट्रेनला जास्त महत्त्व देत आहेत हे दुर्देवी असून मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही, सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

Previous Post

विजयादशमीचा मुहूर्त साधत नांदेडमध्ये भाजपच्या प्रचाराची धूम

Next Post

प्रदीर्घ काळ सत्तेत राहून नांदेडच्या जनतेसाठी काय केले?

Next Post
प्रदीर्घ काळ सत्तेत राहून नांदेडच्या जनतेसाठी काय केले?

प्रदीर्घ काळ सत्तेत राहून नांदेडच्या जनतेसाठी काय केले?

कोपरीगाव यथील नाविन्यपूर्ण ॲम्युझमेंट पार्कचे उत्साहात लोकार्पण

कोपरीगाव यथील नाविन्यपूर्ण ॲम्युझमेंट पार्कचे उत्साहात लोकार्पण

लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

‘जो गरजते है, वो कभी बरसते नही!’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com