• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 21, 2017

आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी घेतला स्वच्छतेचा आढावा

adminbyadmin
in Uncategorized
0
आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी घेतला स्वच्छतेचा आढावा
‘स्वच्छता ही नियमित सवय व्हावी’ – 
नवी मुंबई :  ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत जानेवारी 2018 मध्ये होणा-या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ च्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संबंधित विभागप्रमुख, विभाग अधिकारी व अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन शहरातील स्वच्छता विषयक कामांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा)  रमेश चव्हाण, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त  तुषार पवार, परिमंडळ-1 चे उप आयुक्त  दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ-2 चे उप आयुक्त  अंबरीश पटनिगीरे तसेच सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी, सर्व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने प्राप्त प्रश्नावलीतील निकषांबाबत विषयनिहाय चर्चा करण्यात आली. निकषांनुसार आढळलेल्या त्रुटींची आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्तता करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या.
यामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 च्या अनुषंगाने घनकचरा निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करणे बंधनकारक असून ज्या संस्था अशाप्रकारे कचरा वर्गीकरण करणार नाहीत त्या संस्थांचा कचरा 15 ऑक्टोबर पासून उचलला जाणार नाही असे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे 100 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त असा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणा-या गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स व इतर संस्थांना संस्थेच्या आवारातच कम्पोस्टींग पीट, बायोगॅस अशाप्रकारे कच-यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. ज्या संस्था अशाप्रकारे कच-यावर प्रक्रिया करणार नाहीत, त्या संस्थांचाही कचरा 15 ऑक्टोबर 2017 पासून उचलला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील सर्व शाळा, उद्याने व महानगरपालिकेची कार्यालये इ. ठिकाणी कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्टींग पीटस् बांधण्याचे आदेश देण्यात आले असून इतर शासकीय कार्यालये, खाजगी शाळा, महाविद्यालये इ. ठिकाणीही कंम्पोस्टींग पिटस् बांधणेबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात येणार आहे. 
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल्स, शाळा, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला, मार्केट / मंडई असोसिएशन, उद्यान, स्वच्छ सार्वजनिक / सामुदायिक शौचालय व प्रभाग यांचेमध्ये प्रोत्साहनपर ‘स्वच्छता स्पर्धा’ घेण्यात येणार असून सदर स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशन अतंर्गत स्वच्छता विषयक तक्रारी नोंदविण्याकरीता नागरिकांनी त्यांच्या मोबाईल फोनवर स्वच्छता ॲप डाऊनलोड करणेकरीता त्याबाबतची माहिती नागरिकांना करून देणे, तसेच स्वच्छता ॲपवरील तक्रारींचे त्वरीत निराकरण करणेबाबत आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले. त्याचप्रमाणे स्वच्छता ॲपवरील तक्रारींचे त्वरीत निराणकरण न केल्यास संबंधित अधिकारी / कर्मचा-यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही महापालिका आयुक्त यांनी दिला.
याशिवाय शहरातील कचरा असलेली ठिकाणे स्वच्छ करून सुशोभित करणेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांना शहरातील सर्व पेट्रोल पंपावरील शौचालये वापराकरीता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील साफसफाई व इतर दैनंदिन कामांची नियमित पाहणी करण्याकरीता संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना निर्देश देण्यात आले असून विभाग स्तरावर नेमण्यात आलेल्या गुडमॅर्निंग पथकामार्फत दैनंदिन कार्यवाही करून त्याबाबतची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्वच्छता ही केवळ अभियान कालावधीपुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन सवय व्हावी ही महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भूमिका असून त्यादृष्टीने प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी सतर्क रहावे व अभियान काळात व काळानंतरही नागरिकांचा स्वच्छता कामी संपूर्ण सहयोग असेल याकडे लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
Previous Post

महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध पोलीस बळाचा वापर करून जोडे मारो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

Next Post

सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार :विलास औताडे.

Next Post
सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार :विलास औताडे.

सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार :विलास औताडे.

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात  राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

लिंगायत समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठपुरावा करू : प्रा. राम शिंदे

रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

रोटरीच्या पैठणी महोत्सवाला उदंड प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com