• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2017

लाल फितीच्या कारभारात अडकले तुर उत्पादक शेतकर्‍यांचे ५०० कोटी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लाल फितीच्या कारभारात अडकले तुर उत्पादक शेतकर्‍यांचे ५०० कोटी
गणेश इंगवले / नवी मुंबई
 : राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफी विषयावरून राज्य सरकार विरोधी पक्षांच्या कोंडीत अडकले आहे. त्यातच केवळ राज्य सरकारकडून फाईलवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने तुर उत्पादक शेतकर्‍यांचे तब्बल ५०० कोटी रूपये रखडले असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली. शेतकरी संप, कर्जमाफी, पीकमालाला हमीभाव यामुळे राज्य सरकारविषयी ग्रामीण भागात नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता विरोधी पक्षाला तुर उत्पादक शेतकर्‍यांचे रखडलेल्या पैशाचे नवीन कोलित उपलब्ध झाले आहे.
राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या उद्रेकानंतर आणि विरोधी पक्षांच्या राजकीय गोंधळानंतर मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांकडुन तुर खरेदी केली आहे. सध्या ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला आहे. अजून काही महिन्याने नवीन तुर बाजारात विक्रीला येईल. मात्र उन्हाळ्यात खरेदी केलेल्या तुरीचे पैसे अजून राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना देण्यात आलेले नाहीत.
तुर खरेदी केलेल्या पणनच्या घटकांनी राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. सुरूवातीच्या काळात काही प्रमाणात शेतकर्‍यांना तुरीचे पैसे दिल्यावर राज्य सरकारने  तुरीचे  पैसे देण्यास हात आखडता घेतला आहे. तुर उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून अद्यापि ५०० कोटी रूपये देणे बाकी आहे. याबाबत पणन व तुर खरेदी करणार्‍या केंद्रानी राज्य सरकारला सादर केलेल्या तीन फाईलींना राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. या फाईलीवर निर्णय घेवून सरकारने हमी निर्णय दिल्यास आठवडाभरात तुर उत्पादकांना ५०० कोटी रूपये देणे शक्य होणार असल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
शेतकरी संप, कर्जमाफी या गदारोळामध्ये राज्य सरकारकडून तुर उत्पादक शेतकर्‍यांच्या तीन फाईलवर गेल्या काही दिवसांपासून निर्णय घेतला गेला नाही. लाल फितीच्या कचाट्यात या तीन फाईकली राज्य सरकारकडे खितपत पडल्याने तुर उत्पादकांना अजून काळ पैशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. पाऊस सुरू झालाय, पेरणी व खतांना शेतकर्‍यांकडे पैसे नाही, या तुरीचे पैसे आगामी तुर बाजारात आल्यावर मिळणार काय असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे.
Previous Post

‘माळीण’ गाव फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरणः सचिन सावंत

Next Post

नवी मुंबई, पनवेलमध्ये एसआरए राबविण्यास गृहनिर्माणची नकारघंटा

Next Post
नवी मुंबई, पनवेलमध्ये एसआरए राबविण्यास गृहनिर्माणची नकारघंटा

नवी मुंबई, पनवेलमध्ये एसआरए राबविण्यास गृहनिर्माणची नकारघंटा

पावसातही गारठले नगरसेवक कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे

पावसातही गारठले नगरसेवक कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे

ज्यांच्या त्यागातून नवी मुंबईची निर्मिती झाली त्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विनाविलंब विद्यावेतन सुरुच झाले पाहिजे :आमदार संदीप नाईक यांची मागणी

ज्यांच्या त्यागातून नवी मुंबईची निर्मिती झाली त्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विनाविलंब विद्यावेतन सुरुच झाले पाहिजे :आमदार संदीप नाईक यांची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com