• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2017

सरकारची गाठ यापुढे अन्यायाविरोधात लढणार्‍या नवी मुंबईकरांशी – लोकनेते गणेश नाईक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सरकारची गाठ यापुढे अन्यायाविरोधात लढणार्‍या नवी मुंबईकरांशी –  लोकनेते गणेश नाईक
निर्धार मोर्चासाठी विशाल जनसागर रस्त्यावर
सुजित शिंदे
नवी मुंबई :  गरीबांची कदर करीत नाहीत ते कायदे दुरुस्त करा असे सांगत अन्याय करणार्‍या शासकीय संस्था आणि सरकार यांची  गाठ आता अन्यायाविरोधात लढणार्‍या नवी मुंबईकरांशी आहे, या नवी मुंबईकरांचे नेतृत्व मी करणार आहे, असा इशारा लोकनेते गणेश नाईक यांनी राज्य सरकारसह सिडको, एमआयडीसी आणि महापालिका या शासकीय संस्थांना दिला आहे.
नवी मुंबईतील विविध घटकांवर सरकार आणि शासकीय संस्थांकडून सुरु असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी लोकनेते नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिडको, कोकणभवन, महापालिका आणि एमआयडीसी कार्यालांवर भव्य मोर्चा काढण्यात आला. २५ हजारांपेक्षा जास्त नागरिक नवी मुंबईतील कानाकोपर्‍यातून मोर्चामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील,  माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, सभागृहनेते जयवंत सुतार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दशरथ भगत, पालिकेतील माजी विरोधीपक्षनेते रमाकांत म्हात्रे,पेट्रोलियम बोर्डाचे माजी अध्यक्ष चंदू राणे  कॉंग्रेसचे बहुतांश नगरसेवक आदी उपस्थित होते. बेलापूर येथील क्रोमा शोरुम येथून या मार्चाची अत्यंत शिस्तबध्द आणि शांततेत सुरुवात होवून अर्बन हाट जवळ त्याचे सभेत रुपांतर झाले. राज्य शासन आणि शासकीय संस्थांचा घोषणा देवून निषेध करण्यात आला. या विशाल मोर्चाला संबोधित करण्यास लोकनेते नाईक यांनी सुरुवात करताच त्यांच्या जयजयकार करण्यात आला.
निर्धार मोर्चा हा कुणाच्या विरोधात नाही तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. नवी मुंबईकरांचा आहे. हा मोर्चा अन्यायाच्या विरोधात आणि अत्याचार करणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात असल्याचे लोकनेते नाईक यांनी सुरुवातीच स्पष्ट केले. सिडकोने वेळेवर गावठाण विस्तार केला नाही त्यामुळे ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधकामे केली त्यामध्ये त्यांचा दोष नाही. मात्र बांधकामे नियमित करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याअनुषंगाने ठोस कायद्याच्या कसोटीवर टिकणारे धोरण सादर करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टिका त्यांनी केली. सरकारला जर ठोस धोरण तयार करता येत नसेल तर त्यांनी मला सांगावे, मी ठोस धोरण सुचवतो, असा सल्लाही त्यांनी दिला. सिडकोच्या बसेसची हवा काढण्याचे आंदोलन केल्यानंतर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती सुरु झाली होती याची आठवण त्यांनी याप्रसंगी करुन दिली. परिक्षा काळातही नवी मुंबईतील झोपडयांवर, घरांवर तोडक कारवाई सुरु आहे. निदान नागरिकांचे दुःख समजून घेवून कोर्टाकडून परिक्षा काळासाठी सवलतीची मागणी सरकारने करायला हवी परंतु या सरकारला जनतेच्या व्यथा समजून घ्यायच्या नाहीत, असा आरोप लोकनेते नाईक यांनी केला. ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये एसआरए योजना आणतात मात्र नवी मुंबईत आणत नाही, हा दुजाभाव का? असा खडा सवाल त्यांनी केला. तुर्भे येथे शहराचा कचरा आणून टाकला जातो. शास्त्रीय पध्दतीने येथील डंम्पींग ग्राउंडचे व्यवस्थापन करु, असे पालिका प्रशासनाने सांगितले होते प्रत्यक्षात तसे झालेच नाही. उलट येथील दुर्गंधीमुळे तुर्भे परिसरात रोगराई वाढली. त्यामुळे स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांना रहिवाशांच्या बाजूने योग्य अशी भुमिका घेण्याची मुभा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिघा वासियांची घरे वाचत असतील पक्षांतर करण्याची परवानगी अपर्णा गवते आणि इतर नगरसेवकांना दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली. सरकार आणि सरकारी संस्थांची दादागिरी सुरु आहे. सिडको नोडमध्ये आता एन.ए.च्या नोटीसा धाडण्यात आल्या आहेत आणि लाखोंची बिले भरण्याचा तगदा लावला आहे. हॉकर्स पॉलिसी सरकारने मंजुर केली नाही आणि हातावर पोट भरणार्‍या शहरातील गरीब फेरिवाल्यांवर कारवाई सुरु आहे. फेरिवाल्यांनी रस्त्यावर बसावे असे आम्ही मुळीच म्हणत नाही मात्र त्यांच्यासाठी धोरण आणून सिडकोने हॉकर्स झोनसाठी भुखंड दिले पाहिजेत, अशी सुचना त्यांनी केली. सगळीकडे तोडाफोडा हे धोरण सरकारने अवलंबले आहे. माथाडींची घरे, अल्पउत्पन्न गटातील घरे, एपीएमसीमधील व्यापार्‍यांचे गाळे या सर्वांना नोटीसा धाडून कारवाई सुरु आहे. दंड आकारुन किंवा इतर उपाय करुन ही बांधकामे नियमित व्हायला हवीत. इतर शहरांमध्ये अनधिकृत बांधकामे नाहीत का? मग केवळ नवी मुंंबईतील बांधकामांवरच का कारवाई करता? असा प्रश्‍न त्यांनी विचारला. २००९ पर्यतच्या धर्मिक स्थळांना संरक्षण असतात १०० वर्षांपूर्वीची सर्वधर्मियांची धार्मिकस्थळे तोडण्यात येत असल्याबददल त्यांनी संताप व्यक्त केला. २०१५ पर्यंतच्या विनापरवाना बांधकामांना संरक्षण देणार असल्याचे सरकारने जाहिर करुनही अशी बांधकामे तोडली जात असून सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. पावणे गावातील हरजिंदर सिंग मानकु या माजी वायुदल सैनिकाचे बांधकाम गुरुवारी पालिका आणि एमआयडीसीने कारवाई करुन पाडले. हे बांधकाम १९९५ पूर्वीचे असताना ही हरजिंदर सिंग यांचे काही ही ऐकून न घेता त्यांच्यावर ही अन्यायकारक कारवाई केल्याचे अलिकडचे उदाहरण लोकनेते नाईक यांनी याप्रसंगी दिले. यापुढे सरकारचा सामना अन्यायाविरोधात लढणार्‍याशी असून त्यांचे नेतृत्व मी करणार असल्याचा इशारा लोकनेते नाईक यांनी दिला. १४ तारखेला आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर करण्यात येणार्‍या आंदोलनाता पाठींबा जाहिर करुन या आंदोलनात सहभागी होण्याची आवाहन लोकनेते नाईक यांनी भाषणात केले.  
मोर्चाची प्रस्तावना करताना जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी नवी मुंबईतील सर्वच घटकांवर अन्याय होत असून लोकनेते नाईक यांचा आधार या निर्धार मोर्चाला लाभल्यामुळे अन्याय करणार्‍यांना वठणीवर आणू, असा इशारा दिला. लोकनेते नाईक मंत्री आणि पालकमंत्री असताना जनतेवर कारवाई करण्याची कुणाची हिंमत होत नव्हती, याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. भाजपाचे परिवर्तन जनतेच्या मुळावर उठले असून भाई और बहेनो, असे गोड बोलून बोलून लोकांची पुरती वाट लावल्याचा टोला दशरथ भगत यांनी त्यांच्या मिष्कील भाषणात लगावला. वडिलोपार्जित जागा आणि  त्याबाबतचे जुने कायदेशिर दस्त असूनही दिघावासिय अनधिकृत कसे ठरले, असा प्रश्‍न नगरसेविका अपर्णा गवते यांनी उपस्थित केला.  दिघावासियांच्या प्रश्‍नावर सत्ताधारी राजकारण करीत असून पक्षांतर केल्यास संरक्षण देवू, अशी स्वार्थी राजकीय खेळी करीत असल्याबददल नगरसेविका गवते यांनी खेद व्यक्त केला. गरीब दिघावासियांची घरे वाचत असतील तर पक्षांतर करण्यास परवानगी देणारे लोकनेते नाईक यांचे मन मोठे असल्याचे त्या कृतज्ञतापूर्वक म्हणाल्या. दिघावासियांबाबत सरकार मुके, बहिरे आणि आंधळे झाले असून बैलगाडयांच्या शर्यतीसाठी अध्यादेश काढण्यास तत्परता दाखविणारे सरकार दिघ्यातील माणसांची घरे नियमित करण्यात मात्र दिरंगाई करीत असल्याबददल संताप व्यक्त केला. विकासाच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर गौरविलेल्या नवी मुंबईला बदनाम करण्यासाठी विद्यमान आयुक्तांच्या रुपाने  डिफेक्टिव्ह पिस पालिकेत बसविला असल्याची खरमरीत टिका महापौर सुधाकर सोनावणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर  केली. तुम्ही अन्याय कराला आणि आम्ही स्वस्थ बसू असे समजू नका. वागणं सुधारल नाही तर प्रसंगी कार्यालयात घुसू, असा इशारा त्यांनी दिला. लोकनेते नाईक यांच्या पाठीशी माथाडीवर्ग आहे अशी ग्वाही देवून दादांनी आदेश देताच रस्त्यावर उतरु, असे  आमदार नरेंद्र पाटील म्हणाले. आमदार म्हणून जनतेच्या हदयात आजही दादाच विराजमान आहेत. त्यांची अन्यायाविरोधातील लढाई ही  महाराष्ट्राला दिशा देणारी ठरेल, असे विचार आमदार शशिकांत शिंदे यांनी याप्रसंगी मांडले. सत्ता मिळताच दिलेले आश्‍वासने विसरणारे सरकार असल्याची टिका त्यांनी केली. 
Previous Post

लोकनेते गणेश नाईकांच्या मोर्चाकडे लागले उभ्या महाराष्ट्राचे लक्ष

Next Post

महापालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 3 हजाराहून अधिक उमेदवारांनी घेतला लाभ

Next Post
महापालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 3 हजाराहून अधिक उमेदवारांनी घेतला लाभ

महापालिकेच्या रोजगार मेळाव्याचा 3 हजाराहून अधिक उमेदवारांनी घेतला लाभ

भूमिपुत्रांच्या  लढयाची धार झाली तीव्र

भूमिपुत्रांच्या लढयाची धार झाली तीव्र

मच्छिविक्रेत्या महिलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचे महापौर सुधाकर सोनवणेंना साकडे

माझ्या कामाचा धडाका बघून विरोधकांच्या छातीत कळा - आमदार मंदा म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com