• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 4, 2017

२१व्या शतकातील नवीन मूल्यांची सांगड घालून मराठीला ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याची गरज- मुख्यमंत्री

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
२१व्या शतकातील नवीन मूल्यांची सांगड घालून मराठीला  ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याची गरज- मुख्यमंत्री

डोंबिवली दि ३ अभिव्यक्तीची माध्यमे बदलली असून शाश्वत मूल्यांची कास न सोडता २१ व्या शतकातील नवीन मुल्यांची सांगड घालून मराठीला ज्ञानभाषा म्हणून समृध्द केल्यास मराठीला खरी प्रतिष्ठा मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील पु.भा.भावे साहित्य नगरीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानामुळे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा लक्षणीयरित्या सुधारल्याचे सांगितले. आगरी युथ फोरमने या संमेलनाचे आयोजन केले असून ते ५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

साहित्य संमेलनांची परंपरा केवळ महाराष्ट्रात असून मराठीने आपल्या महान संस्कृतीचे संवर्धन केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, वास्तविक पाहता मराठी ही जगाताली एक प्रमुख भाषा आहे. सुमारे १२ कोटींपेक्षा जास्त लोक मराठी बोलतात. मराठीने साहित्य क्षेत्राला भरभरून दिले आहे मात्र जगाने या भाषेचे प्रभुत्व मान्य केले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तर मराठीतील साहित्य मोठ्या प्रमाणावर अनुवादित होऊन जगभर गेले पाहिजे. आपल्याकडे देखील नोबेलच्या दर्जाचे साहित्य निर्माण करण्याची क्षमता असलेले साहित्यिक आहेत.निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यासंदर्भात अधिक काही जाहीर करता येत नसले तरी पुढील काळात निश्चितपणे यावर ठोस निर्णय घेण्यात येतील आणि साहित्यिकांनी या मंचावरून उपस्थित केलेल्या मराठीविषयक चिंतेची दखल तेवढ्याच गांभीर्याने घेतली जाईल.

मराठी शाळांच्या दर्जाविषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, या शाळा जगविण्यासाठी अनुदान तर आहेच पण त्याशिवाय मराठीला २१ व्या शतकातील ज्ञानभाषा कशी बनविता येईल यादृष्टीने निश्चितपणे प्रयत्न केल्यास मराठीतून शिकण्यासाठी लोक धडपडतील. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानात राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यात आल्या असून २ वर्षांत आपल्या राज्याचे लर्निंग आऊटपूट वाढले आहे. पूर्वी राज्याचा क्रमांक यात १८ वा होता ,तो आता १४ टक्क्यांनी सुधारून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. १७ हजार मराठी शाळांचे १०० टक्के चांगले निकाल येत आहेत. जिप शाळांची ही कामगिरी पाहून इंग्रजी शाळांतील १५ हजार विद्यार्थ्यांनी आपल्या जिप शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संवादाची आणि अभिव्यक्तीची माध्यमे बदलली असून मराठीचा उपयोग हा डिजिटल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु होण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले कि, चीन, जपान, कोरिया या देशांनी आपल्या भाषांमध्ये तंत्रज्ञानात प्रगती केली, त्यामुळे तंत्रज्ञानाची व ज्ञानाची भाषा देखील मराठीत होणे गरजेचे आहे. साहित्य विश्वाशी संवाद वाढवून या क्षेत्राला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न सरकार नेहमीच करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

याप्रसंगी या संमेलनासंदर्भातील “ कणगा” या स्मरणिकेचे तसेच “ भेटी” या माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आपले मनोगत व्यक्त करून संमेलनाध्यक्षांची सूत्रे डॉ अक्षयकुमार काळे यांच्याकडे सोपविली. नवे संमेलनाध्यक्ष डॉ काळे यांनी देखील भाषण केले. यावेळी प्रसिध्द कवी डॉ विष्णू खरे यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अद्य्स्खा श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी देखील भाषण केले. डोंबिवलीतील ज्येष्ठ कवीवर्य श्री धामणस्कर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ रवींद्र शिसवे हे आगरी समाजातील असून त्यांचाही त्यांच्या कामगिरीबद्धल सत्कार करण्यात आला. प्रारंभी आनंद पेंढारकर यांनी रचलेले संमेलन गीत गाण्यात आले. 

कार्यक्रमास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार कपिल पाटील, आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार गणपत गायकवाड त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साहित्यिकांची उपस्थिती होती.       

Previous Post

महिला शक्ती एकत्र आली पाहिजे – आ.मंदा म्हात्रे

Next Post

भक्तिमय वातावरणात ‘श्री साई सुमरिन संध्या’ नाटक संपन्न.

Next Post
भक्तिमय वातावरणात ‘श्री साई सुमरिन संध्या’ नाटक संपन्न.

भक्तिमय वातावरणात 'श्री साई सुमरिन संध्या' नाटक संपन्न.

गांवठाणातील घरांवरील कारवाईच्या अपप्रचाराचे महापालिकेकडून खंडन

महापौरपदासाठी शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी

६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

तुकाराम मुंढे नावाचा करिश्मा ओसरला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com