• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 25, 2016

वाहने योग्य जागी पार्कींग करण्यासह वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाहने योग्य जागी पार्कींग करण्यासह वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
गणेश इंगवले / नवी मुंबई
 
  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूने वाहने पार्क केलेली आढळून येतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होत असल्याच्या तसेच वाहतुकीला त्रास होऊन वाहतुक कोंडी होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला वाहने उभी रहात असल्याने दैनंदिन स्वच्छता करतानाही या वाहनांचा अडसर होत आहे. महत्वाचे म्हणजे अत्यंत तातडीच्या प्रसंगी रूग्णवाहिका,  अग्निशमन वाहने यांनाही या पार्कींग केलेल्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर अडचण होऊन मदतकार्य करण्यात अडथळा होताना दिसतो. यापैकी अनेक वाहने तर खूप दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असलेली आढळून येतात. या सर्व गोष्टींचा दैनंदिन नागरी जीवनावर परिणाम होतोच शिवाय आपत्ती प्रसंगातही मोठा अडसर होतो.
 महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रात वन साईड पार्कींग, वन वे – टू वे वाहतुक, नो पार्कींग झोन अशा विविध प्रकारे पार्कींगचे नियोजन केलेले आहे व त्यानुसार ठिकठिकाणी नो पार्कींगचे सूचना फलकही लावण्यात आलेले आहेत. नागरिकांनी वाहतुक नियमांचे पालन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी मानून सहकार्य करावे असे समस्त नागरिकांना आवाहन आहे.
 अनेक रस्त्यांवर बेवारस वाहने पडून आहेत अथवा कितीतरी वाहने अनेक महिने, वर्षे उभ्या असलेल्या ठिकाणाहून हलविलेली दिसत नाहीत. अशा अनेक वाहनांच्या मालकांना महानगरपालिकेने नोटिसाही बजावलेल्या आहेत. यापुढील काळात अशाप्रकारची एकाच जागी बराच काळ उभी असणारी वाहने महानगरपालिकेमार्फत उचलण्यात येऊन क्षेपणभूमीवर नेण्यात येतील त्याचप्रमाणे बेवारस वाहनांबाबत आरटीओ कडून त्यांच्या क्रमांकावरून त्यांचे मालक शोधून त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
 याशिवाय ब-याच रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, स्कुल बसेस पार्कींग होत असल्याने वाहतुक कोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होताना दिसतो. अशाप्रकारची वाहने योग्य पार्कींग जागेतच पार्क करण्यात यावीत,  अन्यथा कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.
 अनेक ठिकाणी अनधिकृत गॅरेजेसचे काम रस्त्यांवरच चाललेले निदर्शनास येते. त्यामुळे वाहतुक कोंडी होतेच, शिवाय त्याठिकाणी पंक्चरचे पाणी, प्लास्टिक रॅपरचा कचरा तसाच टाकला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छताही पसरते. अशा ठिकाणी रस्त्यांवर दुरूस्तीचे काम चालत असल्याने रहदारीला व वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होत असतो. अशा गॅरेजेस चालकांनी वाहन दुरूस्तीसाठी करण्यात येणारा रस्त्याचा वापर त्वरीत थांबवावा अन्यथा त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपाची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येईल, कायदेशीर कारवाई करण्यात येईल व मोटार व्हेईकल कायद्यानुसार गरज भासल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.
 मा.न्यायालयाने पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असल्याने त्यावर त्यांचा हक्क प्राधान्याने असल्याचे आदेशित केले आहे. तथापि ब-याच सोसायट्यांमधील वाहने, विशेषत्वाने दुचाकी वाहने पदपथावर उभी केली जात असल्याने नागरिकांना पदपथ चालण्यासाठी उपलब्ध होत नाहीत, याचीही दखल नागरिकांनी घ्यावयाची आहे.
 त्याचप्रमाणे अनेक इमारतींमध्ये पार्कींगसाठी असलेल्या स्टिल्ट जागा बांधकाम करून अनधिकृतपणे वाणिज्य/निवासी वापरात आणल्याचेही आढळून येत असून त्या इमारतींमधील सदनिका/गाळा धारकांची वाहने मात्र रस्त्यांवर उभी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बाहेर रस्त्यांवर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी होऊन रहदारीला त्रास होत आहे. अशा इमारतींवरही अनधिकृत स्टिल्ट पार्कींग जागा खुल्या करण्याची कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी त्यापुर्वीच आपल्या अनधिकृतरित्या बंद केलेल्या स्टिल्ट पार्कींगच्या जागा पार्कींगसाठी खुल्या कराव्यात असे आवाहन आहे.     
 अशाप्रकारे नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर कुठेही पार्क न करता आपल्या मालकीच्या जागेतच पार्क करावीत जेणेकरून वाहतुकीला, रहदारीला, शहर स्वच्छतेला व आपत्ती प्रसंगात वाहनाचा अडथळा होणार नाही असे सूचित करण्यात येत आहे.
 नवी मुंबई हे आपले सुनियोजित शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून नागरिकांनी कुठेही वाहने पार्क करून शहराला बकालपणा येऊ न देण्याची काळजी घ्यावी आणि वाहतुक नियमांचे पालन करून संपूर्ण सहकार्य करावे असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Previous Post

विधानसभा अधिवेशनात नवी मुंबईच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांना वाचा फोडली

Next Post

नवी lमुंबईतील येथील रेल्वे वसाहतीतील प्रलंबित कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

Next Post
नवी lमुंबईतील  येथील रेल्वे वसाहतीतील  प्रलंबित कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

नवी lमुंबईतील येथील रेल्वे वसाहतीतील प्रलंबित कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

आयडब्ल्यूटीसी स्पर्धेचे अजिंक्यपद चिनच्या  जिया जिंग लू हिने पटकाविले, स्लोव्हेनियाची तमारा झिदान्सेक उपविजेती

आयडब्ल्यूटीसी स्पर्धेचे अजिंक्यपद चिनच्या जिया जिंग लू हिने पटकाविले, स्लोव्हेनियाची तमारा झिदान्सेक उपविजेती

राज्यभर विना अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू

30 डिसेंबरनंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com