• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 16, 2016

ग्रामस्थांची घरे आणि धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटीसा तातडीने मागे घ्याव्यात

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
संसदीय अभ्यासवर्गाचे 7 डिसेंबर रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन
** समुहविकास योजनेच्या नविन अधिसूचनेत ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव करावा
** आमदार संदीप नाईक यांनी मांडली लक्षवेधी सुचना 
** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर
नागपूर  : नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने सिडकोला दिल्या. त्या ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव समुह विकास योजनेच्या नविन अधिसूचनेत करावा, अशी मागणी आज आमदार संदीप नाईक यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून विधीमंडळ अधिवेशनात केली. त्याचबरोबर शासनाने आश्‍वासित करुनही ग्रामस्थांची घरे आणि धार्मिक स्थळांना नोटीसा देण्यात येत आहेत या नोटीसा त्वरीत मागे घेण्याची मागणी त्यांनी केली असता या सुचनांचा सकारात्मक विचार करण्याचे संकेत देत या सुचना तपासून पाहू असे उत्तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नाईक यांना दिले.
सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे  पूनर्वसन वेळेत पूर्ण केले नाही त्यामुळे काळाच्या ओघात कुटुंब वाढल्याने ग्रामस्थांनी गरजेपोटी निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे केली. ही बांधकामे नियमित करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. दाटिवाटीने आणि नियोजनशुन्य पध्दतीने ही बांधकामे उभी राहिल्याने फेब्रुवारी २०१५मध्ये शासनाने गावठाण विकासासाठी क्लस्टर योजना  जाहिर केली. मात्र या योजनेत प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा अंतर्भाव नव्हता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी या योजनेला विरोध दर्शविला आहे. या विरोधात आंदोलनही छेडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या तीव्र भावनांचा विचार करुन समुहविकास योजनेच्या नविन अधिसूचनेत ग्रामस्थांच्या सुचनांचा समावेश करुन सर्वसमावेशक योजना जाहिर करावी, अशी मागणी पुन्हा एकदा आमदार नाईक यांनी केली. यापूर्वी देखील आमदार नाईक यांनी विधानसभेत आणि शासन स्तरावर सर्वसमावेशक समुहविकास योजनेची मागणी वेळोवेळी केली आहे. आजच्या लक्षवेधी सुचनेवर बोलताना आमदार नाईक यांनी ग्रामस्थांच्या घरांना आणि धार्मिक स्थळांना येत असलेल्या नोटीसांचा विषयही उपस्थित केला. शासनाने आश्‍वासित करुनही या नोटीसा धाडण्यात येत असल्याचे नमूद करुन  या  नोटीसा तातडीने मागे घेण्याची मागणी केली.  आमदार संदीप नाईक यांच्या या लक्षवेधी सुचनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. आमदार नाईक यांच्या सुचनांचा सकारात्मक विचार करण्याचे संकेत देवून हे विषय तपासून पाहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
Previous Post

नवी मुंबई पालिका प्रभाग समित्यांवरील आणि सिडको कंडोमिनियमअंतर्गत कामांवरील बंदी उठवावी

Next Post

नेरुळ सेक्टर 23 दारावे येथील अनधिकृत इमारत निष्कासीत

Next Post
नेरुळ सेक्टर 23 दारावे येथील अनधिकृत इमारत निष्कासीत

नेरुळ सेक्टर 23 दारावे येथील अनधिकृत इमारत निष्कासीत

नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला घणसोलीतील “वॉक विथ कमिशनर”

नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला घणसोलीतील "वॉक विथ कमिशनर"

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नेरूळमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com