• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 7, 2016

लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही- जितेंद्र आव्हाड

adminbyadmin
in ठाणे
0
लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही- जितेंद्र आव्हाड
  • ठाणे : हिटलरचा आदर्श मानून केंद्रातले भाजप सरकार लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. ज्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये पत्रकारांवर लोकशाहीच्या चौथ्या खांबाची धुरा सोपविलेली, तो चौथा खांब हे सरकार नेस्तनाबूत करू पाहत आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीला धडा शिकविणारी ही जनता आता केंद्रातल्या सरकारलाही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही, असा इशारा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ठाणेकरांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात गडकरी रंगायतन ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
  •  एनडीटीव्ही या वृत्तवाहिनी या वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. त्यावरील बंदी सरकारने कँडल मार्चची दाखल घेऊन उठविली. मात्र सरकारच्या या हुकूमशाहीच्या निषेधार्थ सोमवारी ठाणेकरांनी कँडल मार्च काढून ठाणेकरांच्यावतीने निषेध नोंदविला. येथील गडकरी रंगायतनामधून हा मार्च निघाला. हातात पेटत्या मेणबत्या घेऊन ठाणेकर नागरिक हाताला काळ्या रिबन बांधून हा मार्च जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी निवृत्त न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, आमदार आव्हाड, डॉ. राम माळी, आनंद परांजपे, डॉ.अभिजीत वैद्य, संजय भोईर, ऋता आव्हाड, मुख्याध्यापिका आमला स्टॅन्ले विक्रांत चव्हाण, शानू पठाण, अमित सरैय्या, सुहास देसाई आदींसह तरुण तरुणी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     लोकशाहीमध्ये पत्रकारितेला मोठे स्थान आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य केंद्रात असलेल्या सरकारला नको आहे. सरकारची एकाधिकारशाही त्यांना अमलात आणायची आहे. यासाठीच केंद्र सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशी गळचेपी करीत आहे. अशा सरकारला आगामी निवडणुकांमध्ये ही जनता खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे सांगून सरकारला हिट्लरशाहीची उपमा देऊन त्यांनी निषेध केला. पत्रकारांची सरकार अशी गळचेपी करीत असेल तर पत्रकार त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Previous Post

प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीचा आता पावणे चार टक्क्यांसाठी सिडकोविरोधात लढा

Next Post

विथ कमिशनर अभियान राबविण्याची मागणी

Next Post
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

विथ कमिशनर अभियान राबविण्याची मागणी

शॉर्ट सर्किटमुळे शिवम सोसायटीच्या विद्युत डीपीमध्ये आग

शॉर्ट सर्किटमुळे शिवम सोसायटीच्या विद्युत डीपीमध्ये आग

गटारांच्या कामाची व सार्वजनिक शौचालयांच्या कामाची तपासणी करून बांधकाम गुणवत्ता चाचपणी करण्याची मागणी

गटारांच्या कामाची व सार्वजनिक शौचालयांच्या कामाची तपासणी करून बांधकाम गुणवत्ता चाचपणी करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com