• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 20, 2016

ऐश्वर्य हा स्मिताचा मुलगा, माझा नाही : जयदेव ठाकरे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ऐश्वर्य हा स्मिताचा मुलगा, माझा नाही : जयदेव ठाकरे

रेशन कार्डावरून उध्दवने माझे नाव काढले

मुंबई : मी ऐश्वर्याचा पिता नाही, ऐश्वर्य हा स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे असे बुधवारी जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीवरुन वाद सुरु असून या प्रकरणाची सुनावणी सध्या उच्च न्यायालयात सुरु आहे.  

जयदेव ठाकरे यांनी न्यायालयाला ऐश्वर्य आपला मुलगा नसल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी त्याला वारस केले असून, मातोश्रीत पहिला मजला दिला आहे. स्मिता ठाकरे ही जयदेव ठाकरे यांची पूर्वपत्नी आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे. 

स्मिता ठाकरे यांना राजकारणात पूर्वीपासून रस होता. मात्र, माँसाहेब गेल्यानंतर त्यांना राजकारणाची अधिक ओढ लागली. मात्र, बाळासाहेबांना  हे पटत नव्हते, असे जयदेव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीसंदर्भातील उलटतपासणीत सांगितले. स्मिता ठाकरे यांना राजकारणात रस वाटू लागल्याने आम्हा पती-पत्नीत वाद होऊ लागले. त्यामुळे बाळासाहेबांच्या तब्येतीला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्याच सांगण्यावरून मी तात्पुरत्या स्वरूपात ‘मातोश्री’ निवासस्थान सोडले. उद्धव ठाकरे यांनी रेशन कार्डावरून माझे नाव काढले, अशी माहितीही त्यांनी दिली होती. 
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून जयदेव व उद्धव यांच्यात वाद सुरू झाला. जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे होती. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी जयदेव यांची उलटतपासणी घेतली. दुसऱ्या दिवशी जयदेव यांना सुमारे ८० प्रश्न विचारण्यात आले.

‘जाहीर सभांमध्ये जवळच्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करावी लागते. बाळासाहेब त्यांच्या निकटवर्तीयांवर अशीच टीका करायचे आणि रात्री सगळे एकत्र यायचे. हे मला पटत नसल्याने मी राजकारणापासून दूर राहिलो,’ असे जयदेव यांनी स्पष्ट केले. 

Previous Post

‘जलदूत’ जुलै अखेर पर्यंतच धावणार ?

Next Post

आरोग्य विभागामार्फत मलेरिया-डेंग्यु प्रतिबंधात्मक विशेष मोहिम

Next Post
आरोग्य विभागामार्फत मलेरिया-डेंग्यु प्रतिबंधात्मक विशेष मोहिम

आरोग्य विभागामार्फत मलेरिया-डेंग्यु प्रतिबंधात्मक विशेष मोहिम

दिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत तरुणीवर गँगरेप

पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त

दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण

कारवार्ई थांबवा, प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांच्या हिताची योजना आणा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com