• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 22, 2016

कारवार्ई थांबवा, प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांच्या हिताची योजना आणा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण
आमदार संदीप नाईक यांनी औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेत जोरदार मागणी केली.
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघा येथील पिडीत रहिवाशांच्या हिताची योजना तात्काळ आणावी आणि तोपर्यंत या रहिवाशांच्या बांधकामावर सुरू असलेली कारवाई त्वरीत थांबवावी, अशी जोरदार मागणी आ. संदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान आज औचित्याच्या मुद्याद्व्रारे विधानसभेमध्ये केली.
ंविधानसभेमध्ये औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून हा विषय मांडताना आ. नाईक म्हणाले, भर पावसाळ्यात गावठाण प्रकल्पग्रस्त आणि दिघा येथील सर्वसामान्यांच्या बांधकामांवर सिडको, एमआयडीसी आणि नवी मुंबई महानगरपालिका या प्राधिकरणांच्या माध्यमातून बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाई विरोधात येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून मोर्चे, आंदोलने करून त्यांनी आपला संताप वेळोवेळी व्यक्त केला आहे. मात्र या घटकांच्या मागण्यांवर अद्यापही शासनाने कार्यवाही केली नाही.
आ. नाईक यांनी औचित्याचा मुद्दा मांडताना प्रकल्पग्रस्त आणि दिघा वासियांच्या भावनांना वाट करून देत या भावना अतिशय तीव्र असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री महोदय आणि शासनाने प्रकल्पग्रस्त तसेच दिघावासियांच्या हिताची योजना तात्काळ जाहीर करावी आणि तोपर्यंत या घटकाच्या बांधकामांवर अन्यायकारक कारवाई सुरू आहे ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आ. नाईक यांनी विधिमंडळाच्या आवारात आंदोलन केले. प्रकल्पग्रस्तांच्या सूचनांचा अंतर्भाव करून गावठाण विस्तारासाठी सर्वसमावेशक योजनांचा जीआर तातडीने प्रसिद्ध करावा, अशी मागणी केली आहे. गेली सात वर्षे आ. नाईक प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंत्री स्तरावर, सिडको महामंडळाबरोबर भेटीगाठी, पत्रव्यवहार, विधिमंडळ अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्‍न, औचित्याचा मुद्दा इत्यादी माध्यमातून अविरतपणे पाठपुरावा करीत आहेत. त्याचबरोबर दिघावासियांची घरे नियमित करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले आहेत.
Previous Post

पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त

Next Post

लिटल चॅम्पच्या बालकांकडून वृक्षारोपण उत्साहात

Next Post
लिटल चॅम्पच्या बालकांकडून वृक्षारोपण उत्साहात

लिटल चॅम्पच्या बालकांकडून वृक्षारोपण उत्साहात

चड्डी बनियन गँगच्या चार दरोडेखोरांना अटक

बहीणीची फसवणूक करणारा भामटा जेरबंद

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे नागरिकांच्या उत्साही प्रतिसादात “वॉक विथ कमिशनर”

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे नागरिकांच्या उत्साही प्रतिसादात "वॉक विथ कमिशनर"

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com