• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 19, 2016

माफीऐवजी राहुल गांधी खटल्याला सामोरे जाणार

adminbyadmin
in देश - विदेश
0
मोदींनी अमेरिकेत 16 वेळा कपडे बदलले – राहुल  गांधी
  • नवी दिल्ली : गांधी हत्येबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या विधानाबाबत माफी मागण्याऐवजी खटल्याला सामोरे जाण्याचा पवित्रा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे. संघाविरुद्धचे आपले विधान सिद्ध करण्यासाठी आपण पुरावे सादर करू, असे ते म्हणाले. राहुल यांनी गांधी हत्येबद्दल संघाविरुद्ध केलेल्या विधानाबाबत माफी मागावी; अन्यथा खटल्याला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर राहुल यांनी ही भूमिका जाहीर केली.
  • गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात झालेला पत्रव्यवहार राहुल न्यायालयात सादर करतील, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. संघाविरुद्ध केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील न्यायालयात गुन्हेगारी अब्रूनुकसानीचा खटला सुरू आहे. तो रद्द करण्याची मागणी राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली होती. त्यावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही कोणाविरुद्ध जेव्हा बोलता तेव्हा सावधपणे बोलायला हवे, असे कडक शब्दांत सुनावले होते.

    तसेच या विधानाबद्दल माफी मागावी किंवा खटल्याला सामोरे जावे, असे मतही नोंदविले होते. राहुल गांधी यांनी एका निवडणूक प्रचारसभेत गांधी यांच्या हत्येसाठी संघ जबाबदार असल्याचे विधान केले होते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी २७ जुलै रोजी होईल.

    दरम्यान, संघाची भूमिका उघड व्हावी यासाठी काँग्रेस पुरावे गोळा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधींच्या हत्येनंतर नेहरू यांनी पटेल यांना पत्र लिहून संघावर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या उत्तरादाखल पटेल यांनी लिहिलेले पत्र महत्त्वपूर्ण आहे.

    कारण, या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, बापूंचा मारेकरी नथुराम गोडसे संघाच्या विचारसरणीने प्रेरित होता आणि महात्म्याच्या हत्येनंतर संघाने मिठाई वाटली होती. काँग्रेस राहुल यांचा बचाव करताना इतर कागदपत्रांसह हे पत्रही सादर करणार आहे.

Previous Post

कारमधून ६० हजाराचा ऐवज चोरीस

Next Post

जेटटींमधून लवकरच प्रवासीसेवा

Next Post
दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण

जेटटींमधून लवकरच प्रवासीसेवा

महापालिका आयुक्त मुंढेंच्या डोळ्यांमध्ये धुळफेक

सीवूड येथे शनिवारी ‘वॉक विथ कमिशनर’

अ‍ॅट्रॉसिटी समितीची बैठक बोलवा

अ‍ॅट्रॉसिटी समितीची बैठक बोलवा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com