• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2016

हिट अँड रन प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

adminbyadmin
in देश - विदेश
0
 
 
 

महाराष्ट्र सरकारने दाखल केली याचिका

नवी दिल्ली – प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याची २००२ मधील हिट अँड रन प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (मंगळवार) दाखल करुन घेतली.  त्यामुळे लवकरच सर्वोच्च न्यायालयात सलमानविरोधात खटला उभा राहणार असून, त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅकवर टाकण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. 
‘या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून ‘ऑन मेरिट’ सुनावणी करण्यास सलामन खान याची मान्यता आहे काय, अशी विचारणा अखेरच्या दिवशी आम्हाला करण्यात आली होती. सलमान खान यांनी यास मान्यता दर्शविल्याची माहिती आज आमच्याकडून न्यायालयास देण्यात आली आहे. तेव्हा या प्रकरणाची अंतिम सुनावणी योग्य वेळी होईल,‘‘ असे खान याचे वकिल आनंद देसाई यांनी सांगितले. 

या प्रकरणी १३ वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमान याची मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधील हिट अँड रन प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक‘ पद्धतीनुसार करण्यास न्यायाधीश जगदीश सिंग खेहर आणि न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने मान्यता दिली नव्हती. 

२८ सप्टेंबर २००२ साली वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळ सलमान खानच्या लँड क्रूजर गाडीने फूटपाथवर झोपलेल्या ५ जणांना चिरडले होते, त्यात एकाचा बळी गेला तर इतर काही जण जखमी झाले. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यानंतर सबळ पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी त्याची सुटका केली होती.

मात्र महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारचा हा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला असून आता सुप्रीम कोर्टात सलमानविरोधात खटला उभा राहणार आहे.  या प्रकरणी १३ वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमान याची मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधील हिट अँड रन प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची सुनावणी ‘फास्ट ट्रॅक‘ पद्धतीनुसार करण्यास न्यायाधीश जगदीश सिंग खेहर आणि न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने मान्यता दिली नव्हती. 

Previous Post

मुंबईत चीनी मालावर बहिष्कार

Next Post

लोकशाहीत बहुमत हे निसरड्या लादीवरील शेवाळ्याप्रमाणे – उद्धव ठाकरे

Next Post
पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

लोकशाहीत बहुमत हे निसरड्या लादीवरील शेवाळ्याप्रमाणे - उद्धव ठाकरे

दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेचे स्वार्थी राजकारण

आमदार संदीप नाईक यांचा कोपरखैरणे विभागाकरिता १० जुलै रोजी ‘जन संवाद’

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

एसटीचा ठावठिकाणा समजणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com