• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 29, 2016

नवी मुंबई पालिकेकडून धोकादायक इमारती जाहीर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई पालिकेकडून धोकादायक इमारती जाहीर, पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई : गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धोकादायक इमारतींची घोषणा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करुनन नवी मुंबईतील हजारो कुटुंबांना दिलासा दिला आहे. यामुळे आता धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीव मुठीत धरुन राहणाऱ्या रहिवाशांवरील टांगती तलवार दूर झाली असून, लोकांनी याचे स्वागत केले आहे .

 सिडकोने 1970 पासून नवी मुंबई वसविण्यास सुरवात केली. गरिब आणि मध्यमवर्गींयासाठी सिडकोने उभारलेली घरे 15 वर्षातच पडण्यालायक झाली. वाशीतील हजारो घरे धोकादायक असल्याचे राज्य सरकार, सिडको , पालिकांचे अहवाल असतानाही आजपर्यंत मनपा प्रशासनाने धोकादायक इमारती घोषीत केल्या नव्हत्या.

 पालिकेच्या या बोटचेपी धोरणामुळे सध्या हजारो कुटुंब जीव मुठीत धरून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये एक एक दिवस काढत आहेत. मात्र नुकतेच पालिका आयुक्त म्हणून रूजू झालेल्या तुकाराम मुंढे यांनी आपल्या निर्णयक्षमतेची चुनुक दाखवित 20 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून शहरवासीयांना मोठा दिलासा दिला आहे.

 पालिकेने 187 सोसायट्या धोकादायक असल्याचे जाहिर केले आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना आपल्या घराची पुर्नबांधणी करता येणार आहे. त्याच बरोबर नवी मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडू नये म्हणून, येत्या 2 महिन्यात शहराचा विकास आराखडाही पूर्ण करणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

 वाशीतील नगरसेवक असलेले किशोर पाटकर गेल्या १५ वर्षापासून पालिका दरबारी धोकादायक इमारती घोषीत करा, यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीकडून पालिका प्रशासनावर दबाव असल्यानेच धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप पाटकरांनी केला आहे. मात्र आता नवीन आलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील कळीचा मुद्दा बनलेला धोकादायक इमारतींचा पश्न त्वरीत सोडवला आहे. त्याच पद्धतीने विकास आराखडाही लवकर तयार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Previous Post

मराठीसह PMOची वेबसाइट सहा प्रादेशिक भाषांमध्ये

Next Post

दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

Next Post
दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

दाऊदशी संभाषण केल्या प्रकरणी खडसेंविरोधात हॅकरची कोर्टात धाव

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिपण्णी

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिपण्णी

शिधावाटपच्या गोदामांना भेटी देणार आमदार संदीप नाईक यांची माहिती

शिधावाटपच्या गोदामांना भेटी देणार आमदार संदीप नाईक यांची माहिती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com