• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 12, 2016

नेरूळ गावात पालिका कर्मचार्‍यांना शिवीगाळ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मनपा आयुक्त मुंढेसाहेब, अनधिकृत नळजोडण्यांवरील कारवाई खरी का खोटी? पाणीचोरांवर फौजदारीच गुन्हे दाखल कराच!

अनधिकृत नळजोडणी तोडणार्‍यांना पोलीस संरक्षणाची गरज 

नवी मुंबई : अनधिकृत नळजोडण्यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाने सोमवारपासून कारवाई सुरू केली असली तरी आता अनधिकृत नळजोडणी  करणार्‍यांच्याच जिविताला धोका निर्मांण झाल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी नेरूळगावामध्ये अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका कर्मचार्‍यांना शिविगाळ करण्यात आली. तसेच यापुढे परत आल्यास तंगड्या तोडू अशी भाषा वापरण्यात आल्याने महापालिका कर्मचारी भयभीत झाले आहेत. अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करताना महापालिका प्रशासनाने यापुढे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांकडून करण्यात येवू लागली आहे.
नवी मुंबईमध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अनधिकृत नळजोडण्यांचे प्रमाण अधिक आहे.वाणिज्य वापरकर्त्यांकडूनही अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होत आहे. हॉटेल व्यवसायातीलच लोक मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या जोडल्या जात आहे. 
सोमवारी शिरवणे गावात, मंगळवारी सारसोळे गावात, बुधवारी सेक्टर नेरूळ सहा व नेरूळ गावातील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली. नेरूळ गावामध्ये अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यास महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी गेले असता त्यांना विचित्र अनुभव आला. नेरूळ गावातील काही ग्रामस्थांनी त्यांना शिविगाळ केली व मारहाण करण्याकरता अंगावर धावून आले. यामुळे भयभीत झालेल्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी तेथून काढता पाय घेतला.
गावागावामध्ये घरपट्टी तसेच गावठाणातील इमारती मोठ्या संख्येने आहेत. या इमारतींमध्ये सर्रासपणे अनधिकृत नळजोडण्या पहावयास मिळतात. त्यामुळे शहरी भागाच्या तुलनेत गावठाणात पाणीचोरीचे प्रमाण अधिक आहे. गावठाणामध्ये अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करावयाची म्हटल्यास पाणी खात्याच्या कर्मचार्‍यांच्या अंगावर भीतीने काटे उभे राहतात. गावातील महिला व पुरूष अंगावर धावून येतात. शिविगाळ करतात. त्यामुळे अनेकदा जिवितास धोका निर्माण होत असल्याची भीती पालिका कर्मचार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईच्या काळात अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करून त्या बंद केल्यास नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. या अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातू पाणीचोरी करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

 

Previous Post

मनपा आयुक्त मुंढेसाहेब, अनधिकृत नळजोडण्यांवरील कारवाई खरी का खोटी? पाणीचोरांवर फौजदारीच गुन्हे दाखल कराच!

Next Post

चायनीजच्या अतिक्रमणावर कारवाईची नौटंकी

Next Post
महापालिका आयुक्त, या चायनीज अतिक्रमणाचे अजून किती काळ चोचले पुरवायचे?

चायनीजच्या अतिक्रमणावर कारवाईची नौटंकी

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आता मिळणार ऑनलाइन

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आता मिळणार ऑनलाइन

अणे, हे भाजपनं पुढे केलेले मोहरे -राज ठाकरे

दुष्काळावरील अंमलबजावणीची माहिती द्या!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com