• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2016

हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

लातूर : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काहीच पिकले नाही आणि त्यात वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसेवाघोली येथील 18 वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ऐन दुष्काळात ’हुंडा’ मागणीला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणीची हृद्य पिळवटून टाकणारी ही कहाणी.
लातूर तालुक्यातील भिसेवाघोली या गावात ऐन दुष्काळात ’हुंड्याच्या’ मागणीला कंटाळून मोहिनीनं आत्महत्या केली. 12 वीचे शिक्षण घेतलेल्या मोहिनीच्या लग्नाची लगबग सुरु होती.
लग्नासाठी स्थळं येत होती. मात्र प्रत्येकाकडून 4 ते 5 लाखांच्या हुंड्याची विचारणा केली जायची. वडील पांडुरंग भिसे हे पिग्मी एजंट. जेमतेम 1 एकर शेती. त्यात दुष्काळामुळे दोन्ही हंगामात पेरून काहीच उगवले नाही. दुष्काळामुळे घरात अठरा विश्व दारिद्र्य. पण मुलीचे लग्न करायचं म्हणून भिसे कुटुंबानं शेती विकण्याचा निर्णय घेतला.. त्यांची ही चर्चा मोहिनीने ऐकली. आपल्या लग्नासाठी आई-वडिलांची ही घालमेल पाहवली नाही आणि तीनं गळफास लावून स्वताचं जीवन संपवलं..
आपल्या वडिलांची जमीन आणि पैसे आपल्या मृत्यूमुळे वाचतील, मृत्युनंतर कसल्याही धार्मिक विधीत पैसे खर्च करू नयेत तसेच हुंडा प्रथा ही बंद झाली पाहिजे अशी अपेक्षाही मोहिनीने मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केलीये.
या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दुष्काळात एकीकडे नापिकी आणि पाण्यासाठी तडफडणार्‍या शेतकर्‍यांना आता आपल्या मुलींच्या लग्नासाठी ’हुंडा’ प्रथेचा कसा मुकाबला करावा लागतोय याचं भयाण वास्तव उघडकीस आलंय. अशा हजारो मोहिन्यांना वाचवण्यासाठी गरज आहे ती समाजमन बदलण्याची.

Previous Post

सोसायट्यांमध्ये अग्निशमन व्यवस्थेला प्राधान्य द्या – सौ. पाटील

Next Post

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा 23 जानेवारीपर्यंत बंद

Next Post
कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा 23 जानेवारीपर्यंत बंद

कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा 23 जानेवारीपर्यंत बंद

छुप्या डान्स बारच्या विळख्यात ठाणे अडकले

छुप्या डान्स बारच्या विळख्यात ठाणे अडकले

‘सनीबाई’ लियॉन सादर करणार लावणी

सनी लिऑन नाही करणार ’तंबाखूजन्य’ जाहिराती

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com